परवा एका मित्राचं पत्र आलं होतं. साहेबांनी फारच मनावर घेउन, पेटून वगैरे लिहीलं होतं. बाकी तपशील जाउद्या, पण स्वत:च्या मनाविरुद्ध घरात काही धार्मिक कर्मकांड करावं लागल्यामुळे झालेली चिडचीड पत्रात अगदी पुरेपूर दिसत होती. आणि एक पराभव आणि अपमान झाल्याचा सूरही.
आपल्या मनाविरुद्ध कुठलीही गोष्ट करावी लागणं यातून होणारा त्रास कधी ना कधी सगळ्यांना अनुभवावा लागतो. त्यातून जर "प्रश्न तत्त्वाचा" असेल तर मग विचारायलाच नको! म्हणजे या मित्राच्या बाबतीत, कर्मकांडांना त्याचा तत्त्वत: विरोध असूनही केवळ घरच्या बाकीचांच्या आग्रहावरून त्याला माघार घ्यावी लागली हे तर स्पष्ट आहे. पण मग त्याची पराभूत मन:स्थिती, राग आणि अपमान कितपत समर्थनीय आहे हे मला कळेना. आपल्या जवळच्या, प्रिय व्यक्ती, कुटूंबीय यांच्या साठी आपल्या तत्त्वांना मुरड घालावी लागणे हा पराभव समजावा का?
आणि त्याहीपलिकडे हा पराभव आपला आहे की तत्त्वाचा? मुळात इतका अपमान होण्याइतके आपण मोठे आहोत का? असू, तर मग ज्यांकडून आपला पराभव झाला (असं आपल्याला वाटंतय्) ते आपल्याहीपेक्षा आणि आपल्या "तत्त्वा"पेक्षा मोठे असणार नं? आणि नसू, तर असं धुसफुसत रहाण्यापेक्षा, आपल्याला अजून बरंच मोठं व्हायचं आहे असं समजावं का?
केवळ तत्त्वासाठी मैत्र्या, नाती तुटलेली आपण बघतोच की. पण नात्यांसाठी तत्त्वांना मु्रड घातलेलीही बघतो. मग नात्यांमधला कडूपणा स्वीकारून "तत्त्वनिष्ठा" जपणारे आपण की नात्यांचं मोल तत्त्वांपेक्षा वरचढ ठरवणारे आपण? आणि बाकी वेळेला तत्त्वांचा उदो उदो करत फिरणारे जेव्हा नात्यांसाठी तडजोड करतो, तेव्हा दांभिक होतो का आपण? आणि काळाच्या ओघात नात्यांची उलथापालथ होऊ शकते, तशीच तत्त्वं सुद्धा बदलणार नाहीत याची काय हमी?
मित्राची मारे अशाच काही शब्दात समजूत घालून मी मोकळी झाले. पण माझ्यावर अशी वेळ आली की हे प्रश्न भेडसावत रहाणार ही जाणीवही झाली.
शेवटी प्रश्न तत्त्वाचा आहे...
नाही, ज्याच्यात्याच्या तत्त्वाचा आहे!!
Showing posts with label विचार-तरंग. Show all posts
Showing posts with label विचार-तरंग. Show all posts
Sunday, April 13, 2008
Monday, December 17, 2007
नाताळ आणि दिवाळी
दुकाना दुकानातून भरगच्च सजावटी आणि ताजा माल. सगळीकडे "साले का मेला" लागलेला. सणासाठी खरेदीची गडबड, गर्दी आणि उत्साह. आपापल्या पर्सा, पिशव्या आणि पोरं सांभाळत "हे घेऊ की ते" या विवंचनेत हिंडणार्या ताया, मावश्या, आज्या ... :) पुण्याचा लक्ष्मी रस्ता असूदे, लंडन मधला ऑक्सफर्ड स्ट्रीट नाहीतर सान फ़्रान्सिस्को मधला युनियन स्क्वेअर! सणासुदीला जवळपास असंच चित्र दिसतं! सण कुठला का असेना जगभरात सगळीकडे तोच उत्साह आणतो. घरोघरी तयार होणारे (किंवा तयार आणले जाणारे) खमंग गोड पदार्थ तोच मूड सेट करतात.
भारतात दसरा दिवाळीचा उत्साह ओसरला की इथे नाताळची हवा सुरु झाली. या दिवसात कधीही रस्त्यावर बघितलं तर दर पाच दहा मिनीटाला एखादी तरी गाडी टपावर ख्रिसमसचं झाड आणि पोटात उत्साही पोरं घेऊन जाताना दिसतीये. आपल्या घरातल्या साजर्या होणार्या सणात निसर्गाला सामावून घ्यायची काय ही हौस! ते बघताना मला थेट दसर्याची झेंडूची फुलं, पाडव्याच्या आंब्याच्या डहाळ्या आणि कडूलिंबाचा कोवळा पाला आठवला... म्हणजे आपल्या आणि पाश्चात्य जगात सणोत्सवांमधे खरेदी, गोडधोड पदार्थ आणि सुट्टी यापलिकडे असलेलं हे साम्य आत्तापर्यंत माझ्या तरी लक्षात आलं नव्हतं.
की घराच्या, "आपल्या" संस्कृतीच्या आठवणीनी जीव व्याकुळ होत असताना आपल्याच मनानी हे साम्य शोधून नकळत घातलेली ही समजूत होती कळेना. हे म्हणजे शेजारच्या गोड म्हातारीला "एलायझा आजी" (ट्युलिप, वाचतीये बरं तुझ्या नवीन नोंदी), सहकर्याला "जानराव" आणि Fair Oaks Apartment ला "ओकवाडी" म्हणण्यासारखं! आपल्या भोवतालच्या परकेपणात आपलेपण शोधणं काही फार अवघड नाही!
या वर्षी एक miniature का होईना, Christmas Tree आणावं म्हणते!
भारतात दसरा दिवाळीचा उत्साह ओसरला की इथे नाताळची हवा सुरु झाली. या दिवसात कधीही रस्त्यावर बघितलं तर दर पाच दहा मिनीटाला एखादी तरी गाडी टपावर ख्रिसमसचं झाड आणि पोटात उत्साही पोरं घेऊन जाताना दिसतीये. आपल्या घरातल्या साजर्या होणार्या सणात निसर्गाला सामावून घ्यायची काय ही हौस! ते बघताना मला थेट दसर्याची झेंडूची फुलं, पाडव्याच्या आंब्याच्या डहाळ्या आणि कडूलिंबाचा कोवळा पाला आठवला... म्हणजे आपल्या आणि पाश्चात्य जगात सणोत्सवांमधे खरेदी, गोडधोड पदार्थ आणि सुट्टी यापलिकडे असलेलं हे साम्य आत्तापर्यंत माझ्या तरी लक्षात आलं नव्हतं.
की घराच्या, "आपल्या" संस्कृतीच्या आठवणीनी जीव व्याकुळ होत असताना आपल्याच मनानी हे साम्य शोधून नकळत घातलेली ही समजूत होती कळेना. हे म्हणजे शेजारच्या गोड म्हातारीला "एलायझा आजी" (ट्युलिप, वाचतीये बरं तुझ्या नवीन नोंदी), सहकर्याला "जानराव" आणि Fair Oaks Apartment ला "ओकवाडी" म्हणण्यासारखं! आपल्या भोवतालच्या परकेपणात आपलेपण शोधणं काही फार अवघड नाही!
या वर्षी एक miniature का होईना, Christmas Tree आणावं म्हणते!
Friday, August 24, 2007
खोड
सकाळच्या उन्हात कॉफी घेत घराच्या पायरीवर उभी होते. रविवारची आळसावलेली सकाळ. हे घर असं टेकाडावर. आजूबाजूला बैठी टुमदार म्हणावी अशी घरं. मागे वर थोडीशी चढत जाणारी टेकडी, आणि घनदाट होत जाणारी झाडी. समोर तीच उतरत जाणारी टेकडी, थोडी घरं आणि मग समोरच्या परिसराला कापत जाणारा रेल्वेमार्ग, पलिकडे आडवा पसरलेला महारस्ता. त्याही पलिकडे औद्योगिक इमारतींचा पट्टा. मधेच एक-दोन अलिशान हॉटेलं. या परिसरात कामाला येणार्यांची नेहेमीची विश्रांतीस्थानं. त्याहीपलिकडे खाडी. आणि खाडीच्या पलिकडे? आहेत की क्षितिजावर निळे डोंगर! छानपैकी अस्ताव्यस्त पसरलेले. बापरे घराच्या पायरीवरून इतकं सगळं दिसतं हे लक्षातच आलं नव्हतं कधी! इथे घटकाभर बसून हे सगळं साठवून ठेवायलाच पहिजे डोळ्यांत!
महारस्त्यावरून जाणार्या वाहनांचा आवाज एकदम जाणवला. म्हणजे इतका वेळ वर्दळ नव्हती असं नाही. पण अचानक कोणीतरी कळ फिरवावी तसा तो आवाज आपल्या अस्तित्त्वाची जाणीव करून द्यायला लागला. आणि मग अचानक सगळेच आत्तापर्यंत फक्त दिसणारे आवाज ऐकू सुद्धा यायला लागले. वार्यानी हलणारी पानं सळसळ आवाज करतायत होय. आणि पलिकडच्या मैदानावर खेळणारी चालत्या बोलत्या बाहुल्यांसारखी दिसणारी मुलं आरडाओरडा सुद्धा करतायत. गंमत म्हणजे आत्तापर्यंत फक्त ऐकू येणार्या गोष्टी दिसायलासुद्धा लागल्या. इतका वेळ नुसतीच चिवचिव करणारी पाखरं चक्क पानांआडून डोकवायला लागली. शेजार्यांच्या हिरवळीवर लावलाय पाण्याचा फवारा, तो एकदमच उन्हात चमकायला लागला.
मला गंमत कळेना. या अचानक माझ्या दुक-श्राव्य संवेदना अशा तीक्ष्ण कशा झाल्या? पलिकडच्या गल्लीत एक गाडी येऊन थांबली. गराजचे दार उघडून आत गेली. गराज बंद झालं. वार्याच्या झुळुकेनी रस्त्याच्या या कडेचा पाचोळा फरफटत त्या कडेला गेला. आणखी एक गाडी टेकडीवरून येतीये, मी बरोब्बर वळून बघितलं त्या क्षणी समोरून वळसा घेऊन खालच्या रस्त्याला लागली ती. मागच्या बाजूला रहाणारे आजोबा नेहेमीप्रमाणे अडगळीतच्या जुन्या पान्या वस्तू काढून काहीतरी खाटखुट करत बसलेत. आणि इतका वेळ नुसताच चिवचिवाट ऐकू येत होता, ते एकूण चार, नाही पाच असावेत बहुतेक, वेगवेगळे पक्षी आपापल्या ताला-सुरात गातायत हेही लक्षात आलं. समोरच्या निळ्या फुलांच्या वाफ्यात मधेच नाजूक गुलाबी फुलं पण आहेत. आणि पलिकडच्या अंगणात दगडगोट्यांनी सजवलेलं ते कारंजं म्हणजे दोन सुबक मासोळ्या आहेत.
हे सगळं आधीपासून होतं, चालूच होतं की. पण दिसलं नाही, आणि ऐकू सुद्धा आलं नाही. आपल्याला हव्या त्या गोष्टी ऐकायची आणि बघायची, नाही चुकलं.... आपल्याला नको त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायची भारी खोड आहे हे खाडकन जाणवलं. आणि ठरवलं रोज घरातून बाहेर पडताना पायरीवर दोन क्षण थांबायचं, डोळे मिटून ऐकायचं, कान बंद करून बघायचं. खूप काय काय दिसतं आणि ऐकू येतं, तेही रोज नवीन नवीन! करून बघा, मजा आहे!
महारस्त्यावरून जाणार्या वाहनांचा आवाज एकदम जाणवला. म्हणजे इतका वेळ वर्दळ नव्हती असं नाही. पण अचानक कोणीतरी कळ फिरवावी तसा तो आवाज आपल्या अस्तित्त्वाची जाणीव करून द्यायला लागला. आणि मग अचानक सगळेच आत्तापर्यंत फक्त दिसणारे आवाज ऐकू सुद्धा यायला लागले. वार्यानी हलणारी पानं सळसळ आवाज करतायत होय. आणि पलिकडच्या मैदानावर खेळणारी चालत्या बोलत्या बाहुल्यांसारखी दिसणारी मुलं आरडाओरडा सुद्धा करतायत. गंमत म्हणजे आत्तापर्यंत फक्त ऐकू येणार्या गोष्टी दिसायलासुद्धा लागल्या. इतका वेळ नुसतीच चिवचिव करणारी पाखरं चक्क पानांआडून डोकवायला लागली. शेजार्यांच्या हिरवळीवर लावलाय पाण्याचा फवारा, तो एकदमच उन्हात चमकायला लागला.
मला गंमत कळेना. या अचानक माझ्या दुक-श्राव्य संवेदना अशा तीक्ष्ण कशा झाल्या? पलिकडच्या गल्लीत एक गाडी येऊन थांबली. गराजचे दार उघडून आत गेली. गराज बंद झालं. वार्याच्या झुळुकेनी रस्त्याच्या या कडेचा पाचोळा फरफटत त्या कडेला गेला. आणखी एक गाडी टेकडीवरून येतीये, मी बरोब्बर वळून बघितलं त्या क्षणी समोरून वळसा घेऊन खालच्या रस्त्याला लागली ती. मागच्या बाजूला रहाणारे आजोबा नेहेमीप्रमाणे अडगळीतच्या जुन्या पान्या वस्तू काढून काहीतरी खाटखुट करत बसलेत. आणि इतका वेळ नुसताच चिवचिवाट ऐकू येत होता, ते एकूण चार, नाही पाच असावेत बहुतेक, वेगवेगळे पक्षी आपापल्या ताला-सुरात गातायत हेही लक्षात आलं. समोरच्या निळ्या फुलांच्या वाफ्यात मधेच नाजूक गुलाबी फुलं पण आहेत. आणि पलिकडच्या अंगणात दगडगोट्यांनी सजवलेलं ते कारंजं म्हणजे दोन सुबक मासोळ्या आहेत.
हे सगळं आधीपासून होतं, चालूच होतं की. पण दिसलं नाही, आणि ऐकू सुद्धा आलं नाही. आपल्याला हव्या त्या गोष्टी ऐकायची आणि बघायची, नाही चुकलं.... आपल्याला नको त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायची भारी खोड आहे हे खाडकन जाणवलं. आणि ठरवलं रोज घरातून बाहेर पडताना पायरीवर दोन क्षण थांबायचं, डोळे मिटून ऐकायचं, कान बंद करून बघायचं. खूप काय काय दिसतं आणि ऐकू येतं, तेही रोज नवीन नवीन! करून बघा, मजा आहे!
Friday, June 15, 2007
आतलं वर्तुळ
कॉलेजमधे असताना मैत्रिणींचे वाढदिवस जोरात साजरे व्हायचे. संध्याकाळी वाढदिवसाळू मैत्रिणीकडे धाड असायची. किलोनी पावभाजी (किंवा इडली-सांबार किंवा भेळ इ. इ.) आणि लिटरनी मिल्क-शेक (किंवा आइसक्रीम किंवा पियुश इ. इ.) तयार करणे हा आईचा न सांगता आखलेला आणि अर्थातच पार नेलेला पाककार्यक्रम असे! या धाडीमधे शाळेतल्या, कॉलेजमधल्या, गल्लीतल्या, क्लासमधल्या ज्या ज्या मैत्रिणींना वाढदिवस लक्षात असेल त्या सर्व सामील असायच्या. भेट म्हणून फक्त एक ग्रीटिंग कार्ड आणावे हा अलिखित नियम. एका वर्षी तर मला आठवतेय इतक्या मैत्रिणी एकदम आल्या की घरात जागाच नव्हती बसायला! हळूहळू सगळ्या पांगल्या, फक्त "घट्ट", सख्ख्या मैत्रिणी रेंगाळल्या. इतका वेळ आतल्या खोलीत तोच पेपर पुन्हा पुन्हा चाळत बसलेले पपा बाहेर डोकाऊन म्हणाले "अरे वा, आता फक्त 'inner circle' उरलंय वाटतं"...
तर मैत्रिची अशी वर्तुळं असतात खरी. म्हणजे आतलं वर्तुळ अधिक महत्त्वाचं किंवा बाहेरचं कमी दर्जाचं असं नाही. पण काही मैत्र्या अमुक एका त्रिज्येच्या आत जातच नाहीत हे मात्र खरं. अगदी कायमस्वरुपी मैत्री असेल तरीही. गंमत म्हणजे या वर्तुळांचा विस्तार कमी जास्त होतो, त्यात लोक प्रवेश करतात, क्वचित सोडूनही जातात; पण अगदी आतलं वर्तुळ तसंच राहतं. किंबहुना, या वर्तुळात फक्त प्रवेश करता येतो, बाहेर पडता येत नाही हेच त्याचं वैशिष्ट्य! आणि या वर्तुळात कोण असेल यालाही काही नियम नाहीत. म्हणजे फक्त अंतरानी जवळ असलं तरच या वर्तुळाची "membership" मिळते असं नाही. आणि तुम्ही पत्र-फोन-इमेल वर संपर्कात असाल तरच मिळते असंही नाही. इतकंच काय जितकी मैत्री जुनी तितके तुम्ही आतल्या वर्तुळात जाल याचाही नेम नसतो.
पण या आतल्या वर्तुळातले मित्र असतात तरी कोण? तुम्ही कधीही, कितीही काळानंतर, कुठूनही, कु्ठल्याही अवस्थेत या मित्राला संपर्क केलात तरी जन्मोजन्मीचं नातं असल्यासारखे एका क्षणात संवाद जोडू शकता. मधला काळ, अंतर नाहीसं होतं. फार काही शब्दांची देवाण-घेवाण करावी लागत नाही. "ए तुला आठवतं" किंवा "किती दिवसांनी बोलतोय आपण" असले संभाषण जोडणारे पूलही लागत नाहीत! आपण स्वत:शी संवाद करावा तसा मोकळा संवाद सहज होऊ शकतो.
अगदी लहानपणी विशाल असणारं हे वर्तुळ कळत नकळत संकुचित होत जातं खरं! पण न कळत्या वयातसुद्धा कुठेतरी पुसटसा परिघ आखलेला असावा बहुतेक. अशीही लहान मुलं दिसतातच की जी काही अनोळखी लोकांकडे सुद्धा सहज झेपावतात, पण अगदी जवळच्या नातेवाइकांकडेही रमत नाहीत! मोठेपणी तर, अगदी माणूस कितीही जगन्मित्र झाला, तरी प्रत्येकाचं आतलं वर्तुळ कधीतरी कुठेतरी आखलेलं असतं असा माझा दावा आहे. कोणाचं जरा अधिक गजबजलेलं असेल कदाचित इतकंच.
तेव्हा पपांना मी "छे! inner circle वगैरे काही नाही, सगळ्या सारख्याच मैत्रिणी आहेत" असं म्हणाल्याचं आठवतंय. त्यात कुठेतरी आपण जगन्मित्र (जगन्मैत्रीण म्हणा हवं तर) वगैरे असल्याची पोकळ पौढी किंवा सूप्त इच्छा असेल कदाचित. किंवा वर्तुळांची ही भूमिती तेव्हा उमजली नसावी. आता नकळत आपली आपल्यालाच ती वर्तुळं दिसायला लागली आहेत. यालाच वयानी, अनुभवानी येणारं शहाणपण म्हणायचं का?
तर मैत्रिची अशी वर्तुळं असतात खरी. म्हणजे आतलं वर्तुळ अधिक महत्त्वाचं किंवा बाहेरचं कमी दर्जाचं असं नाही. पण काही मैत्र्या अमुक एका त्रिज्येच्या आत जातच नाहीत हे मात्र खरं. अगदी कायमस्वरुपी मैत्री असेल तरीही. गंमत म्हणजे या वर्तुळांचा विस्तार कमी जास्त होतो, त्यात लोक प्रवेश करतात, क्वचित सोडूनही जातात; पण अगदी आतलं वर्तुळ तसंच राहतं. किंबहुना, या वर्तुळात फक्त प्रवेश करता येतो, बाहेर पडता येत नाही हेच त्याचं वैशिष्ट्य! आणि या वर्तुळात कोण असेल यालाही काही नियम नाहीत. म्हणजे फक्त अंतरानी जवळ असलं तरच या वर्तुळाची "membership" मिळते असं नाही. आणि तुम्ही पत्र-फोन-इमेल वर संपर्कात असाल तरच मिळते असंही नाही. इतकंच काय जितकी मैत्री जुनी तितके तुम्ही आतल्या वर्तुळात जाल याचाही नेम नसतो.
पण या आतल्या वर्तुळातले मित्र असतात तरी कोण? तुम्ही कधीही, कितीही काळानंतर, कुठूनही, कु्ठल्याही अवस्थेत या मित्राला संपर्क केलात तरी जन्मोजन्मीचं नातं असल्यासारखे एका क्षणात संवाद जोडू शकता. मधला काळ, अंतर नाहीसं होतं. फार काही शब्दांची देवाण-घेवाण करावी लागत नाही. "ए तुला आठवतं" किंवा "किती दिवसांनी बोलतोय आपण" असले संभाषण जोडणारे पूलही लागत नाहीत! आपण स्वत:शी संवाद करावा तसा मोकळा संवाद सहज होऊ शकतो.
अगदी लहानपणी विशाल असणारं हे वर्तुळ कळत नकळत संकुचित होत जातं खरं! पण न कळत्या वयातसुद्धा कुठेतरी पुसटसा परिघ आखलेला असावा बहुतेक. अशीही लहान मुलं दिसतातच की जी काही अनोळखी लोकांकडे सुद्धा सहज झेपावतात, पण अगदी जवळच्या नातेवाइकांकडेही रमत नाहीत! मोठेपणी तर, अगदी माणूस कितीही जगन्मित्र झाला, तरी प्रत्येकाचं आतलं वर्तुळ कधीतरी कुठेतरी आखलेलं असतं असा माझा दावा आहे. कोणाचं जरा अधिक गजबजलेलं असेल कदाचित इतकंच.
तेव्हा पपांना मी "छे! inner circle वगैरे काही नाही, सगळ्या सारख्याच मैत्रिणी आहेत" असं म्हणाल्याचं आठवतंय. त्यात कुठेतरी आपण जगन्मित्र (जगन्मैत्रीण म्हणा हवं तर) वगैरे असल्याची पोकळ पौढी किंवा सूप्त इच्छा असेल कदाचित. किंवा वर्तुळांची ही भूमिती तेव्हा उमजली नसावी. आता नकळत आपली आपल्यालाच ती वर्तुळं दिसायला लागली आहेत. यालाच वयानी, अनुभवानी येणारं शहाणपण म्हणायचं का?
Tuesday, April 17, 2007
बी आणि खत
कुठल्या न कुठल्या निमित्तानी हा कितीही उहापोह केला तरी उत्तर न मिळणारा प्रश्न डोकं काढतोच. मुळात बियाणं चांगलं असेल, तर कुठलंही खत घातलं तरी काय फरक पडतो? मुळात मातीच चांगली असेल तर सामान्य कौशल्य असलेला कुंभार सुद्धा सुबक मडकं करू शकतो का? गळा चांगला असेल तर कुठल्या गुरुकडे गेलात याल कितपत महत्त्व आहे?
एक मात्र खरं; खत, कुंभार, गुरु यांची मुळात गरज असते हे मात्र कोणी नाकारू शकत नाही!
तर परवा चर्चेचा विषय होता की आपल्या जडणघडणीत आपल्या शाळेचं किती योगदान असतं? आपल्या मुलाला अमुक एका शाळेतच प्रवेश मिळावा असा हट्ट धरणं खरच कितपत योग्य आहे? "अति तिथे माती" या न्यायानुसार, कुठलाच अवाजवी हट्ट धरु नये हे जरी खरं असलं, तरी शालेय शिक्षण बर्याच बाबतीत महत्त्वाचं असल्यामुळे "शाळा चांगली हवी" यात तथ्य आहे न?
मला माझ्या शाळेचा खूप अभिमान आहे. माझ्या जडणघडणीत माझ्या शालेय शिक्षकांचा, मैत्रीणींचा आणि शाळेच्या वातावरणाचा फार मोठा वाटा आहे असं मी मानत आलेय. यात शाळेच्या दगडी जुन्या इमारती, लाकडी जिने, मोकळी मैदानं, बुचाची झाडं, भलं मोठं सभागृह, थोरलं ग्रंथालय आणि त्यातली नकाशांनी भरलेली खोली, पाण्याची टाकी सगळं आलं! दरवर्षीच्या स्पर्धा आल्या, हस्तलिखितं आली, निवडणुका आल्या, स्नेहसंमेलनं आली! "मुळात तुमच्यामधे जे काही गुणावगुण असतील त्यात शाळेच्या शिकवणुकीमुळे खरंच किती फरक पडतो?" या प्रश्नाला उत्तर देताना हे सगळं माझ्या डोळ्यापुढून भर्रकन् सरकून गेलं. या सगळ्या गोष्टींचा माझ्यावर खरंच किती ठसा उमटलाय हे व्यक्त करायला बहुतेक मी अपुरीच पडले.
पण "तू दुसर्या कुठल्या शाळेत गेली असतीस तर खरंच तू वेगळी व्यक्ती झाली असतीस?" किंवा "तुझ्या शाळेत जाणार्या सगळ्यांनाच असं वाटतं?" या प्रश्नांचं ठाम उत्तर तर मी किंवा कोणीही देउ शकणार नाही. काहीजण स्वयंपूर्ण असतात, तर काही गुरुस्पर्शानं धन्य होतात. कधी भेट न दिलेल्या शक्यतेच्या जगात कुठलं बियाणं कसं उगवलं असतं हे कसं सांगणार?
एक मात्र खरं; खत, कुंभार, गुरु यांची मुळात गरज असते हे मात्र कोणी नाकारू शकत नाही!
तर परवा चर्चेचा विषय होता की आपल्या जडणघडणीत आपल्या शाळेचं किती योगदान असतं? आपल्या मुलाला अमुक एका शाळेतच प्रवेश मिळावा असा हट्ट धरणं खरच कितपत योग्य आहे? "अति तिथे माती" या न्यायानुसार, कुठलाच अवाजवी हट्ट धरु नये हे जरी खरं असलं, तरी शालेय शिक्षण बर्याच बाबतीत महत्त्वाचं असल्यामुळे "शाळा चांगली हवी" यात तथ्य आहे न?
मला माझ्या शाळेचा खूप अभिमान आहे. माझ्या जडणघडणीत माझ्या शालेय शिक्षकांचा, मैत्रीणींचा आणि शाळेच्या वातावरणाचा फार मोठा वाटा आहे असं मी मानत आलेय. यात शाळेच्या दगडी जुन्या इमारती, लाकडी जिने, मोकळी मैदानं, बुचाची झाडं, भलं मोठं सभागृह, थोरलं ग्रंथालय आणि त्यातली नकाशांनी भरलेली खोली, पाण्याची टाकी सगळं आलं! दरवर्षीच्या स्पर्धा आल्या, हस्तलिखितं आली, निवडणुका आल्या, स्नेहसंमेलनं आली! "मुळात तुमच्यामधे जे काही गुणावगुण असतील त्यात शाळेच्या शिकवणुकीमुळे खरंच किती फरक पडतो?" या प्रश्नाला उत्तर देताना हे सगळं माझ्या डोळ्यापुढून भर्रकन् सरकून गेलं. या सगळ्या गोष्टींचा माझ्यावर खरंच किती ठसा उमटलाय हे व्यक्त करायला बहुतेक मी अपुरीच पडले.
पण "तू दुसर्या कुठल्या शाळेत गेली असतीस तर खरंच तू वेगळी व्यक्ती झाली असतीस?" किंवा "तुझ्या शाळेत जाणार्या सगळ्यांनाच असं वाटतं?" या प्रश्नांचं ठाम उत्तर तर मी किंवा कोणीही देउ शकणार नाही. काहीजण स्वयंपूर्ण असतात, तर काही गुरुस्पर्शानं धन्य होतात. कधी भेट न दिलेल्या शक्यतेच्या जगात कुठलं बियाणं कसं उगवलं असतं हे कसं सांगणार?
Sunday, February 11, 2007
कर कर करा
विंदा करंदीकरांचं "भारतीय स्त्रियांसाठी लिहीलेलं स्थानगीत" परवा ऐकलं (सौजन्य : नक्षत्रांचे देणे)
कर कर करा, मर मर मरा.
दळ दळ दळा, मळ मळ मळा, तळ तळ तळा
तळा आणि जळा.
बाज बाज बाजा, पाज पाज पाजा, पोस पोस पोसा
पोसा आणि सोसा.
धू धू धुवा, शिव शिव शिवा, चिर चिर चिरा
चिरा आणि झुरा.
कुढ कुढ कुढा, चिड चिड चिडा, झिज झिज झिजा
शिजवा आणि शिजा.
चटका बसला.
आमची पिढी भाग्यवान. आमच्यापैकी बहुतजणींना जळावं, सोसावं, झुरावं, शिजावं लागलं नाही. (आणि हे मी फक्त सुशिक्षित मध्यमवर्गींयांबद्दल बोलतीये). हा काळाचा महिमा आहे का? की मागच्या कित्येक पिढयांनी सोसून, वेळोवेळी त्याविरुद्ध झगडून आमच्यासाठी कमावून ठेवलेलं हे पुण्य आहे? असं असताना, विंदांनी जे शब्दात मांडलं ते प्रत्यक्ष न अनुभवता देखील आम्हाला कळतं का? डोळे मिटून क्षणभर मागच्या पिढीतल्या स्त्रियांचा विचार केला की अंगावर सर्रकन् काटा येतोच न? त्यांच्या परिस्थितीच्या नुसत्या कल्पनेनं हताश झालंसं वाटतंच न? वाडा चिरेबंदी मधली "सुख मिळेना तेव्हा मीच सुखास दूर लोटून दिलं" असं म्हणणारी आई आठवते. सुन्न व्हायला होतं, रागही येतो.
हे सगळं आम्ही कुठेतरी पाहिलंय्, आया-आज्यांकडून ऐकलंय्, स्वानुभवकथनातून वाचलंय्. मग मला प्रश्न पडला. मी जर हे असं काही सोसलं नाही, तर मला या "भारतीय स्त्रियांबद्दल" जे काही वाटतं ती सहानुभूती आहे की फक्त हळहळ? एक स्त्री म्हणून तो बसलेला चटका विंदांनी बघितलेल्या आणि म्हणून उत्कटपणे मांडलेल्या चटक्यापेक्षा वेगळा आहे का? मागच्या पिढयांमधून रक्तात वाहत आलेला वारसा आहे का? अजून काही पिढया भविष्यात डोकावून बघितलं, तर त्या भविष्यातल्या स्त्रीलाही असाच चटका बसेल? की काळाच्या ओघात ती जखम भरून निघाली असेल?
माहीत नाही.
कर कर करा, मर मर मरा.
दळ दळ दळा, मळ मळ मळा, तळ तळ तळा
तळा आणि जळा.
बाज बाज बाजा, पाज पाज पाजा, पोस पोस पोसा
पोसा आणि सोसा.
धू धू धुवा, शिव शिव शिवा, चिर चिर चिरा
चिरा आणि झुरा.
कुढ कुढ कुढा, चिड चिड चिडा, झिज झिज झिजा
शिजवा आणि शिजा.
चटका बसला.
आमची पिढी भाग्यवान. आमच्यापैकी बहुतजणींना जळावं, सोसावं, झुरावं, शिजावं लागलं नाही. (आणि हे मी फक्त सुशिक्षित मध्यमवर्गींयांबद्दल बोलतीये). हा काळाचा महिमा आहे का? की मागच्या कित्येक पिढयांनी सोसून, वेळोवेळी त्याविरुद्ध झगडून आमच्यासाठी कमावून ठेवलेलं हे पुण्य आहे? असं असताना, विंदांनी जे शब्दात मांडलं ते प्रत्यक्ष न अनुभवता देखील आम्हाला कळतं का? डोळे मिटून क्षणभर मागच्या पिढीतल्या स्त्रियांचा विचार केला की अंगावर सर्रकन् काटा येतोच न? त्यांच्या परिस्थितीच्या नुसत्या कल्पनेनं हताश झालंसं वाटतंच न? वाडा चिरेबंदी मधली "सुख मिळेना तेव्हा मीच सुखास दूर लोटून दिलं" असं म्हणणारी आई आठवते. सुन्न व्हायला होतं, रागही येतो.
हे सगळं आम्ही कुठेतरी पाहिलंय्, आया-आज्यांकडून ऐकलंय्, स्वानुभवकथनातून वाचलंय्. मग मला प्रश्न पडला. मी जर हे असं काही सोसलं नाही, तर मला या "भारतीय स्त्रियांबद्दल" जे काही वाटतं ती सहानुभूती आहे की फक्त हळहळ? एक स्त्री म्हणून तो बसलेला चटका विंदांनी बघितलेल्या आणि म्हणून उत्कटपणे मांडलेल्या चटक्यापेक्षा वेगळा आहे का? मागच्या पिढयांमधून रक्तात वाहत आलेला वारसा आहे का? अजून काही पिढया भविष्यात डोकावून बघितलं, तर त्या भविष्यातल्या स्त्रीलाही असाच चटका बसेल? की काळाच्या ओघात ती जखम भरून निघाली असेल?
माहीत नाही.
Monday, November 27, 2006
पर्याय आणि निवडस्वातंत्र्य
ऑफिसच्या कॅंटीनच्या मेनूसमोर उभं राहून माझी एक सहकारी तक्रारीच्या सुरात म्हणाली, "हे काय, काही सुद्धा खावंसं वाटत नाही, याला हे लोक भरगच्च मेनू म्हणतात? काही choiceच नाही!" मेनूवर साताठ वेगवेगळे "पर्याय" असूनसुद्धा.
पर्याय ही मोठी मजेशीर गोष्ट आहे. भरगच्च पर्याय हे पुरेशा निवडस्वातंत्र्याचं निदर्शक आहे का? आपल्याला हवा असलेला नेमका पर्याय त्यात नसेल तर? जेव्हा आपण "सगळ्या पर्यायांचा नीट विचार करून मोकळ्या मनानी निवड करता आली पाहिजे" असं म्हणतो तेव्हा कुठेतरी आपल्याला मनापासून हवा असलेला पर्याय उपलब्ध आहे असं आपण गृहित धरलेलं असतं का? तसं नसेल तर मग कसा घेणार मोकळ्या मनानी निर्णय? कारण दिलेल्या पर्यायांची मर्यादा त्यावर आधीच पडलेली असते.
खर्या मोकळ्या मनानी तुम्ही निर्णय घेणार असाल तर तुम्हाला स्वत: पर्याय निर्माण करायचं, कमीत कमी धुंडाळायचं स्वातंत्र्य आणि सामर्थ्य हवं. निवडीचं स्वातंत्र्य हे उपलब्ध पर्यायांच्या पलिकडे जायला हवं. किंवा काही बहुपर्यायी प्रश्नांना कसा पाचवा पर्याय असतो न, "वरीलपैकी काहीही नाही", तसा कायम एक पाचवा पर्याय असावा! पण मग "वरीलपैकी काहीही नाही" हा पर्याय बाकीच्या सगळ्या पर्यायांना निरर्थक करतो. शिवाय "वरीलपैकी काहीही" नसलेलं म्हणजे काय हे नक्की माहीत असेल तर तो पाचवा पर्याय निवडण्यात अर्थ आहे न?
"हो ना, काही choiceच नाही" असं म्हणत आमचा घोळका ऑफिससमोरच्या रेस्टॉरंट कडे वळला, हे सांगणे नलगे! संध्याकाळी घरी आले आणि मेघना पेठेंचं "आंधळ्याच्या गायी" समोर दिसलं!
"
घटना घडतात.
पुरातल्या ओंडक्यासारखी माणसं त्यात वाहून जातात.
घडायचं ते घडून जातं...
पण तरीही पर्याय असतातच ठाकलेले..
तडफडण्याचे... हसण्याचे... रडण्याचे... हरण्याचे... जिंकण्याचे...
क्षमेचे... सूडाचे... स्वीकृतीचे... तुकण्याचे... साक्षित्त्वाचे...
त्यातला एकच निवडता येणार असतो,
आणि निवडावा तर लागणारच असतो!
पर्यवसान ठाऊक नसताना अंधारात घ्यावी लागणारी उडी...
माणसाच्या आयुष्यात नियत आहे ते हे.
यालाच आपण स्वातंत्र्य म्हणतो!
जाणिवेचा लख्ख उजेड नाही, आणि नेणिवेचा गच्च अंधार नाही,
अशा तिन्हीसांजेला, अंधुक प्रकाशातल्या जुलमी रानात
सोडाव्या लागणार्या या आंधळ्याच्या गायी...
त्यांना म्हणे देव राखतो...!
आणि आंधळा?
तो तर फक्त या भोळ्या विश्वासाची बासरी वाजवत राहतो.
"
पर्याय ही मोठी मजेशीर गोष्ट आहे. भरगच्च पर्याय हे पुरेशा निवडस्वातंत्र्याचं निदर्शक आहे का? आपल्याला हवा असलेला नेमका पर्याय त्यात नसेल तर? जेव्हा आपण "सगळ्या पर्यायांचा नीट विचार करून मोकळ्या मनानी निवड करता आली पाहिजे" असं म्हणतो तेव्हा कुठेतरी आपल्याला मनापासून हवा असलेला पर्याय उपलब्ध आहे असं आपण गृहित धरलेलं असतं का? तसं नसेल तर मग कसा घेणार मोकळ्या मनानी निर्णय? कारण दिलेल्या पर्यायांची मर्यादा त्यावर आधीच पडलेली असते.
खर्या मोकळ्या मनानी तुम्ही निर्णय घेणार असाल तर तुम्हाला स्वत: पर्याय निर्माण करायचं, कमीत कमी धुंडाळायचं स्वातंत्र्य आणि सामर्थ्य हवं. निवडीचं स्वातंत्र्य हे उपलब्ध पर्यायांच्या पलिकडे जायला हवं. किंवा काही बहुपर्यायी प्रश्नांना कसा पाचवा पर्याय असतो न, "वरीलपैकी काहीही नाही", तसा कायम एक पाचवा पर्याय असावा! पण मग "वरीलपैकी काहीही नाही" हा पर्याय बाकीच्या सगळ्या पर्यायांना निरर्थक करतो. शिवाय "वरीलपैकी काहीही" नसलेलं म्हणजे काय हे नक्की माहीत असेल तर तो पाचवा पर्याय निवडण्यात अर्थ आहे न?
"हो ना, काही choiceच नाही" असं म्हणत आमचा घोळका ऑफिससमोरच्या रेस्टॉरंट कडे वळला, हे सांगणे नलगे! संध्याकाळी घरी आले आणि मेघना पेठेंचं "आंधळ्याच्या गायी" समोर दिसलं!
"
घटना घडतात.
पुरातल्या ओंडक्यासारखी माणसं त्यात वाहून जातात.
घडायचं ते घडून जातं...
पण तरीही पर्याय असतातच ठाकलेले..
तडफडण्याचे... हसण्याचे... रडण्याचे... हरण्याचे... जिंकण्याचे...
क्षमेचे... सूडाचे... स्वीकृतीचे... तुकण्याचे... साक्षित्त्वाचे...
त्यातला एकच निवडता येणार असतो,
आणि निवडावा तर लागणारच असतो!
पर्यवसान ठाऊक नसताना अंधारात घ्यावी लागणारी उडी...
माणसाच्या आयुष्यात नियत आहे ते हे.
यालाच आपण स्वातंत्र्य म्हणतो!
जाणिवेचा लख्ख उजेड नाही, आणि नेणिवेचा गच्च अंधार नाही,
अशा तिन्हीसांजेला, अंधुक प्रकाशातल्या जुलमी रानात
सोडाव्या लागणार्या या आंधळ्याच्या गायी...
त्यांना म्हणे देव राखतो...!
आणि आंधळा?
तो तर फक्त या भोळ्या विश्वासाची बासरी वाजवत राहतो.
"
Monday, September 25, 2006
सहानुभूती
जुनी गोष्ट. कत्रिना चक्रीवादळाच्या वेळी आम्ही काही सहयोगी चर्चा करत होतो, पीडितांच्या दुर्दशेबद्दल सहानुभूती व्यक्त करत होतो. आमच्यातील एक, फ्लोरिडा चा रहिवासी, बराच वेळ आमची चर्चा ऐकून घेत होता. आणि मग थोड्या वेळाने कत्रिना मुळे ताज्या झालेल्या त्याच्या लहानपणीच्या चक्रीवादळ एंड्र्यूच्या आठवणींबद्दल सांगायला लागला. त्या वेळी झालेले त्याचे हाल त्याला आठवले. सगळं घर उद्ध्वस्त झालेलं जणू काही त्याच्या डोळ्यांसमोर त्याला दिसत होतं. कत्रिना मधे वाताहत झालेल्या शेकडो कुटुंबांचं दु:ख त्याच्या आठवणीत उमटलेलं दिसत होतं. तेव्हा मला जाणवलं की कत्रिना पीडितांबद्दल खरी सहानुभूती फक्त बहुतेक त्यालाच वाटत होती, बाकीचे आम्ही व्यक्त करत होतो निव्वळ हळहळ.
सहनुभूती म्हणजे सह-अनुभूती. एकत्र घेतलेला अनुभव, किंवा एकसमान अनुभवातून निर्माण झालेली जवळीकीची भावना. दुसर्याचे दु:ख (बहुधा दु:खच, कारण सहानुभूती या शब्दात दु:ख अध्याहृत नसलं, तरी त्याच्या वापरात असतं) बघून आपल्याला आलेल्या तशाच अनुभवाची आठवण होऊन जागी झालेली वेदना. पण पुष्कळ वेळेला दुसर्याच्या दु:खाबद्दल व्यक्त केलेली हळहळ सहानुभूती म्हणुन गैरसमजली जाते. अर्थात याचा अर्थ असा नाही की मनापासून हळहळ व्यक्त करणार्याच्या भावना कमी महत्त्वाच्या असतात. पण जेव्हा आपण त्या वेदना जगलेल्या असतो, तेव्हाच त्याच्याशी खरी सहानुभूती दाखवू शकतो ना? कितीही मनापासून व्यक्त केली गेली तरी हळहळ खूपच परकी वाटायला लागते मग.
मन इतकं तरल होऊ शकतं का की स्वानुभवाशिवाय सहानुभूती जाणवावी? हळहळ आणि सहनुभूती यातील सीमारेषा नाहीशी व्हावी? फक्त दु:ख, वेदना यातून गेल्यावरच आपल्याकडे दुसर्याचं दु:ख समजण्याइतकी क्षमता येते? इंग्रजी मधे "relate" हा अगदी चपखल शब्द आहे या भावनेसाठी. त्याला मराठीत "सहकंप" म्हणता येईल का? असा सहकंप फक्त कटु अनुभवातूनच जन्म घेतो का? आनंद चार चौघांबरोबर वाटून घेतला की दुणावतो हे जरी खरं असलं, तरी एकत्र अनुभवलेली दु:खं आपल्याला एकमेकांच्या अधिक जवळ आणतात, घट्ट बंध निर्माण करतात. म्हणूनच "सहानुभूती" यात शब्दश: अध्याहृत नसलेलं दु:ख त्या भावनेत मात्र अंगभूत होऊन जात असेल का?
सहनुभूती म्हणजे सह-अनुभूती. एकत्र घेतलेला अनुभव, किंवा एकसमान अनुभवातून निर्माण झालेली जवळीकीची भावना. दुसर्याचे दु:ख (बहुधा दु:खच, कारण सहानुभूती या शब्दात दु:ख अध्याहृत नसलं, तरी त्याच्या वापरात असतं) बघून आपल्याला आलेल्या तशाच अनुभवाची आठवण होऊन जागी झालेली वेदना. पण पुष्कळ वेळेला दुसर्याच्या दु:खाबद्दल व्यक्त केलेली हळहळ सहानुभूती म्हणुन गैरसमजली जाते. अर्थात याचा अर्थ असा नाही की मनापासून हळहळ व्यक्त करणार्याच्या भावना कमी महत्त्वाच्या असतात. पण जेव्हा आपण त्या वेदना जगलेल्या असतो, तेव्हाच त्याच्याशी खरी सहानुभूती दाखवू शकतो ना? कितीही मनापासून व्यक्त केली गेली तरी हळहळ खूपच परकी वाटायला लागते मग.
मन इतकं तरल होऊ शकतं का की स्वानुभवाशिवाय सहानुभूती जाणवावी? हळहळ आणि सहनुभूती यातील सीमारेषा नाहीशी व्हावी? फक्त दु:ख, वेदना यातून गेल्यावरच आपल्याकडे दुसर्याचं दु:ख समजण्याइतकी क्षमता येते? इंग्रजी मधे "relate" हा अगदी चपखल शब्द आहे या भावनेसाठी. त्याला मराठीत "सहकंप" म्हणता येईल का? असा सहकंप फक्त कटु अनुभवातूनच जन्म घेतो का? आनंद चार चौघांबरोबर वाटून घेतला की दुणावतो हे जरी खरं असलं, तरी एकत्र अनुभवलेली दु:खं आपल्याला एकमेकांच्या अधिक जवळ आणतात, घट्ट बंध निर्माण करतात. म्हणूनच "सहानुभूती" यात शब्दश: अध्याहृत नसलेलं दु:ख त्या भावनेत मात्र अंगभूत होऊन जात असेल का?
Monday, March 06, 2006
पाखरू
आज सकाळी खूप अस्वस्थ करणारी गोष्ट बघितली. सकाळी ऑफिसला जाताना एक चिमण्या पाखरांचा घोळका रस्त्याच्या कडेला अगदी जमिनीजवळून भरारी मारत होता. आणि माझ्या पुढच्या मोठया एस्. यू. व्ही. च्या चाकाखाली त्यातील एक पाखरू..... मला एकदम धक्का बसल्या सारखं झालं, मी कचकन् ब्रेक दाबला, अर्थात त्याचा काही उपयोग नव्हता! आणि मागच्या गाडीने जोरात हॉर्न वाजवला तो वेगळाच..
पण ते पाखरू काही दिवसभर डोक्यातून जाईना. त्याच्या घोळक्यातली पाखरं त्याला शोधत बसली असतील का? त्याला असं निपचित पडलेलं बघून चिवचिवाट करत तिथे घोटाळत राहिली असतील का? की आपल्या रोजच्या कार्यक्रमाला लागली असतील? माझ्यासारखं त्यांच्यापैकी कोणाच्या डोक्यात त्यांचा सोबती घोळत राहीला असेल का? एक न दोन.
आता थोडे दिवस तरी त्या रस्त्यावरून जाताना त्याची आठवण येत राहील...
पण ते पाखरू काही दिवसभर डोक्यातून जाईना. त्याच्या घोळक्यातली पाखरं त्याला शोधत बसली असतील का? त्याला असं निपचित पडलेलं बघून चिवचिवाट करत तिथे घोटाळत राहिली असतील का? की आपल्या रोजच्या कार्यक्रमाला लागली असतील? माझ्यासारखं त्यांच्यापैकी कोणाच्या डोक्यात त्यांचा सोबती घोळत राहीला असेल का? एक न दोन.
आता थोडे दिवस तरी त्या रस्त्यावरून जाताना त्याची आठवण येत राहील...
Subscribe to:
Posts (Atom)