tag:blogger.com,1999:blog-216801202024-03-07T18:51:40.980-08:00आपुला संवाद आपणासी ...Sumedhahttp://www.blogger.com/profile/16250876354718364108noreply@blogger.comBlogger48125tag:blogger.com,1999:blog-21680120.post-32034118432770729952010-06-18T23:17:00.000-07:002010-06-20T18:25:48.806-07:00भयभय. भयाबद्दल एक नक्कीच सांगीन. जीवनाचा तो एकमेव खरा शत्रू. फक्त भयच जीवनाला हरवू शकतं. भय चलाख असतं, क्रूर गनीम असतं... त्याला न सभ्यता, न नियमांचं बंधन, न कोणाची दया माया. त्याला तुमची कमकुवत बाजू बरोब्बर दिसते, आणि थेट तिथेच ते जाउन भिडतं! त्याची सुरुवातच मुळी तुमच्या मनात होते. एका क्षणी तुम्ही शांत, धीरगंभीर असता. स्वत:शी आनंदी, समाधानी असता. मग? मग एखाद्या निरुपद्रवी कुशंकेचा बुरखा पांघरून भय चलाखीनं तुमच्या मनात शिरतं. पाउल न वाजवता, एखाद्या गुप्तहेरा सारखं... तुम्ही अनभिद्न्य असता, नकळत स्वत:ला समजावता "ही बारीकशी कुशंका माझं काय करणार?" तुमचा अविश्वास कुशंकेला हुसकावून लावू बघतो. पण अविश्वास चिलखत नसलेल्या शिपायासारखा असतो. कुशंकेला त्यावर अचूक वार करून पुरता नाकाम करायला असा कितीसा वेळ लागणार? मग मात्र तुम्ही अस्वस्थ होता. विवेकाला पाचारण करता. अविश्वास हरला म्हणून काय झालं, विवेकबुद्धि तर सशत्र, सुसज्ज आहे न? तुम्हाला खात्री वाटते, बुद्धि नक्की मात करेल कुशंकेवर. पण अहो आश्चर्यम्, लहान सहान वार सहजी परतवून लावणारी विवेकबुद्धि सुद्धा थकतेच शेवटी, आणि हार मानते! आणि तिथेच पहिल्यांदा तुमच्या पायाखालची जमीन सरकते. तुम्ही धपापता...<br /><br />भय मग आपला मोर्चा तुमच्या शरीराकडे वळवतं. त्या बापड्याला येणा-या संकटाची चाहूल लागलेली असतेच की! एव्हाना तुमच्या नकळत तुमच्या छातीचा भाता झालेला असतो आणि पोटात ढवळून निघत असतं. जिभेला कोरड पडलेली असते, दात वाजत असतात. थोडक्यात काय तुम्ही गलितगात्र होता! तुमच्या शरीराचा प्रत्येक अवयव रणांगण सोडून पळायला तयार असतो. पण तुमचे डोळे मात्र शाबूत असतात, त्यांचं भय नावाच्या शत्रूकडे बारीक लक्ष असतं.<br /><br />मग तुम्ही अविचारानी निर्णय घेता. आणि तुमच्या साथीदारांना तुम्ही निरोप देता : आशा आणि विश्वास. त्याच क्षणी तुमच्याच हाती तुमचाच पराभव झालेला असतो! भय, ज्याची सुरुवात एका हलक्या कुशंकेनी होते, तुमच्यावर मात करतं...<br /><br />हे सगळं शब्दात सांगणं किती जड आहे! कारण... भय, निखळ भय, मृत्यूला सामोरं जाताना वाटेल असं काळोखी भय, तुमचा पायाच हादरवून टाकणारं क्रूर भय, तुमच्या स्मृती, संवेदना काळवंडून टाकणारं भय... भय सगळं चैतन्यच शोषून टाकतं, तिथे बापड्या शब्दांची काय कथा!<br /><br />म्हणूनच, सगळी शक्ती पणाला लावून भयाला वाचा फोडा. भयाला शब्दांवाटे मूर्त रूप द्या. शब्दांच्या तेजानी भयाला दिपवून टाका. नाहीतर एक नि:शब्द अंधार होऊन भय रेंगाळत राहील. त्या अंधाराला तुम्ही चुकवाल कदाचित, दुर्लक्ष कराल, तात्पुरते विसरूनही जाल! पण स्वत:ला अधिक कमकुवत कराल. तुमचा पराभव केलेल्या त्या प्रबळ प्रतिस्पर्ध्यापुढे दुबळे होऊन जाल, त्याच्या हल्ल्यांना सामोरं जाण्यासाठी अगदीच नि:शस्त्र व्हाल!<br /><br />कारण एकदा तुमच्यावर मात केलेल्या त्या शत्रूला तुम्ही खरी टक्कर कधी दिलेलीच नसेल ...<br /><br />From Life of Pi by Yann Martel<div class="blogger-post-footer">???? ??? ???? ????| ???? ???? ? ??????||</div>Sumedhahttp://www.blogger.com/profile/16250876354718364108noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-21680120.post-1177604210136032082008-11-08T20:35:00.000-08:002008-11-08T21:50:05.857-08:00रचुया पुस्तक पंढरी...असं कधी तुम्हाला झालंय का? एखाद्या कवितेची एखादी ओळ आठवतीये, खूप पूर्वी वाचलेल्या पुस्तकातला एखादा संवाद आठवतोय, शाळेच्या पुस्तकातला एखादा उतारा आठवतोय पण काही केल्या पुढचं काही आठवत नाही. भारतातल्या घरी पुस्तकांच्या कपाटात ते पुस्तक नेमकं कुठे आहे हेसुद्धा माहीत असतं. आणि आत्ता जाऊन ते उघडून बघावं या तीव्र इच्छेनी सगळा दिवस अस्वस्थतेत जातो. शेवटी एकदाची संध्याकाळ होते, तुम्ही फोन फिरवता आणि कोणीतरी "घरुन" पुढच्या ओळी वाचून दाखवतं! तेव्हा कुठे चैने पडतं!<br /><br />किंवा तुम्ही भारतातही असलात तरी एखादं जुनं पुस्तक, नाटक,कवितासंग्रह शोधशोधून सुद्धा मिळत नाही. अप्पा बळवंत चौक पालथा घालून झालेला असतो, बुजूर्ग मित्र-नातेवाईकांच्या पायर्या चढून झालेल्या असतात. त्यांच्याकडून त्या पुस्तकाबद्दल ऐकायला मिळतं पण पुस्तक काही मिळत नाही. विद्यापीठाच्या ग्रंथालयातून नेमकी शेवटची प्रत गहाळ झालेली असते :(<br /><br />"आत्ता ते पुस्तक online असतं तर..." विचार मनाला शिवून जातो. अगदी याच विचारानी सुरु झालेला प्रकल्प आहे <a href="http://marathipustake.org/">marathipustake.org</a>. तुम्ही भेट दिलीये? नसेल तर जरुर द्या!<br /><br />मराठीतील जुनी दुर्मिळ पण मौल्यवान पुस्तके digitize करून internet वर मुक्तपणे सर्वांना उपलब्ध करून देणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. जी पुस्तकं आता दुकानातून नाहीशी झाली आहेत, ग्रंथालयातूनही कदाचितच उपलब्ध आहेत. ज्या पुस्तकांनी इतिहास घडवला आहे, पण तरी आज फक्त नावंच उरली आहेत. संत वाङमय, जुनी नाटकं, कविता, निबंध. हे सगळं जुनं सोनं पुनर्जीवित करून सर्वांना उपलब्ध करून देणे हा एकच उद्देश. यासाठी लेखाधिकाराच्या कक्षेबाहेरची पुस्तके मिळवून टंकलिखित करणे हे मुख्य काम स्वयंसेवकांच्या प्रयासानी सुरु आहे. <p>अर्थात हा महत्त्वाकांक्षी दूरदर्शी प्रकल्प दीर्घकाळ चालू ठेवायला आणि यशस्वी करायला गरज आहे मराठी साहित्यप्रेमी स्वयंसेवकांची! California च्या San Francisco Bay Area मधील <a href="http://calaaonline.com/">CalAA</a> (California Arts Association) या संस्थेतर्फे या प्रकल्पास हातभार लावण्यासाठी नुकतेच संघटित प्रयत्न सुरु झाले आहेत. तुम्हाला या प्रकल्पात सामील व्हायला आवडेल?</p> <p>या प्रकल्पासाठी पुस्तके सुचविणे, शक्य असल्यास ती मिळविणे, मराठी टंकलेखनात भाग घेऊन ती पुस्तके digitize करणे, आणि टंकित झालेल्या पुस्तकांचे मुद्रितशोधन (proof-reading) करणे अशा विविध प्रकारे तुम्ही योगदान देऊ शकता. उदा. सध्या आम्ही "समग्र बालकवी" चे टंकलेखन सुरु केले आहे.</p> <p>तुम्हाला या प्रकल्पा बद्दल काही प्रश्न असतील, तर मला या ब्लॉगवर प्रतिक्रियेद्वारे संपर्क करा. या प्रकल्पात सामील होण्यासाठी PustaCalAA या google - इ-पत्र गटात सामील व्हा, बाकीच्या सभासदांशी संवाद साधा, आत्तापर्यंत सुचवलेली पुस्तके बघा, अजून पुस्तके सुचवा, ती मिळवून सर्वांपर्यंत पोचवा आणि टंकलेखनाच्या कामात सहभागी व्हा! त्यासाठी तुमच्या प्रतिक्रियेत तुमचा email पत्ता कळवा (मी तो प्रसिद्ध करणार नाही!). किंवा तुमचा google ID वापरून या गटाच्या सभासदत्त्वाचा अर्ज करा!</p> <p>तुमच्या उत्साही प्रतिसादाची वाट बघते :)</p><div class="blogger-post-footer">???? ??? ???? ????| ???? ???? ? ??????||</div>Sumedhahttp://www.blogger.com/profile/16250876354718364108noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-21680120.post-44112945416411413782008-11-03T17:37:00.001-08:002008-11-08T06:57:44.470-08:00मंगल तोरणआज किती दिवसांनी इंद्र धनुष्य भेटलं! तेसुद्धा कसं? एखादा रोमांचक नाट्यसोहळा व्हावा तसं!<br /><br />आणि रंगमंच तरी काय सजला होता! आकाशात वर बघावं तर अगदी गर्द निळे ढग. धीरगंभीर, अविचल उत्सुकतेनं सोहळ्यासाठी तयार झालेले! आणि कुठून तरी चुकार सूर्यकिरण डोकावत होतेच! असा जादूई सोनेरी प्रकाश अक्षरश: सांडला होता न सगळीकडे, की प्राजक्ताची फुलं नाजूक हातानं वेचावी तसा तो जाऊन वेचता आला तर आयुष्यभर जपून ठेवता येईल असं वाटलं! सगळं खरंच शांत झालं की माझ्या संवेदना बाकी काही टिपेना झाल्या कोणास ठाऊक! आणि मग अचानक "lights, camera rolling, ACTION" असं कोणी म्हणावं आणि नटून थटून सज्ज झालेल्या कलाकारानी प्रवेश करावा, तसे ते सातही रंग प्रकट झाले, बघता बघता गडद होत गेले! काय झोकदार प्रवेश! सातही रंग पारखून घ्यावे, चित्रही तेच, नाट्यही तेच, नृत्यही तेच आणि संगीतही तेच! साथ होती नं, उत्स्फूर्तपणे वाजणार्या वार्याच्या शीळेतून आणि उत्साहानी पिटणार्या पानांच्या टाळ्यांतून खुलत जाणारी! बाकी आकाशात काहीच हालचाल नाही! सहकलाकारही दिपून, दबून गेले असावेत, तो रंगसोहळा बघून आपला पदन्यास विसरून गेले असावेत? की त्या सप्तरंगांच्या जादूवर खिळून राहिलेल्या माझ्या नजरेनी त्यांची नृत्यसाथ टिपली नसावी?<br /><br />किती वेळ झाला असेल माहीत नाही! मग त्या आकाशातल्या नायकाचं दिलखुलास मिरवून झालं म्हणून, की ढळणार्या सूर्याची साथ करत जाणं भाग पडलं म्हणून की डोंगरांपलिकडे दुसरा रंगमंच सजताना दिसतोय म्हणून; त्यानी आपलं प्रदर्शन आवरतं घेतलं खरं! आणि तेही कसं डौलानं. एका क्षितिजावर घट्ट पाय रोवून दुसर्या टोकाकडून हळूच अंग चोरून घेत. त्याच्यावर खिळलेली माझी नजर सुद्धा आकाशात एक गोफ विणत गेली, गोलाकार, झोकदार!<br /><br />पण छे! नाट्य संपलं नव्हतं अजून! आता तर सहकलाकारांना उत्साह आला. भानावर येऊन, अंग घुसळून आसमंत त्यांनी दणाणून सोडला आणि क्षणार्धात चारी दिशा चिंब भिजवून टाकल्या! त्या नव्यानी सुरु झालेल्या नाट्यातून त्यांचा निरोप खचित माझ्यापर्यंत पोचला,<br /><br />"असतील त्याच्याकडे रंग तेजस्वी, आमचेही नृत्य कौशल्य काही कमी नाही!"<br /><br />"हो रे बाबांनो!"<br /><br />मी हसत माझ्या कामाला लागले. खिडकी सोडताना आता कुठे लक्ष गेलं रस्त्यावर शिस्तीत धावणार्या गाड्यांकडे! नुसतंच हसून त्यांना म्हणाले, "रंगमंदिरात हजर असूनसुद्धा हा अप्रतिम सोहळा सोडून नीरस रस्त्याकडे बघावं लागणं हे काय अहोदुर्भाग्य! तुम्हालाही कधीतरी तो कलाकार उराउरी भेटू दे!"<br /><br />कोणे एके काळी अशाच कुठल्याशा अनुभूतीला बालकवींनी शब्दबद्ध केले असेल न? आज तो सोहळा त्या सदाबहार शब्दांची अनुभूति देत भिजवून गेला! आणि तो डोळ्यांसमोर तरळत असतानाच मी त्या रंगांच्या जादूगाराला प्रश्न केला, पुढची भेट कधी? अशीच अवचित?<div class="blogger-post-footer">???? ??? ???? ????| ???? ???? ? ??????||</div>Sumedhahttp://www.blogger.com/profile/16250876354718364108noreply@blogger.com5tag:blogger.com,1999:blog-21680120.post-42961026414716034082008-08-28T12:13:00.000-07:002008-09-11T14:53:26.643-07:00साखळी हायकू!बर्याच वर्षांपूर्वी कोणीतरी हायकू या प्रकाराची ओळख करून देताना हे ऐकवलं होतं :<br /><br />देवळातल्या घंटेचा<br />आवाज दूरवर लोपला<br />रस्ता तिथेच संपला!<br /><br />काही दिवसांपूर्वी ते असंच आठवलं आणि काही केल्या डोक्यातून जाईना. मागच्या आठवड्यात संवेदनी <a href="http://samvedg.blogspot.com/2008/08/blog-post_20.html">काव्यमय खो खो</a> सुरु केला. आज <a href="http://sagars.blogspot.com/">सागर</a>नी माझ्या <a href="http://samidhach-sakhya.blogspot.com/2008/08/blog-post.html">कविते</a>वर कवितारुपी प्रतिक्रिया धाडली आणि या सगळ्यातून साखळी हायकूची कल्पना सुचली.<br /><br />तर नियम :<br /><br />१) वर दिलेल्या हायकू प्रमाणे दोन किंवा तीनच ओळींचा (की ओळींची?) हायकू रचायचा.<br />२) त्यातील मात्रा, ताल, ध्वनीरुप तसंच्या तसं आलं तर उत्तम, शक्य तितकं साम्य राखायचा प्रयत्न करायचा.<br />३) सर्वात महत्त्वाचे, ही साखळी असल्यामुळे तुम्ही जी कडी गुंफणार आहात तिची आधीच्या कडीशी काहीतरी जोडणी असावी : त्यातील लपलेल्या किंवा स्पष्ट दिसणार्या अर्थानुसार, त्यातील वापरलेल्या प्रतिमेनुसार, सुचित केलेल्या कल्पनेनुसार किंवा व्यक्त होणार्या भावनेनुसार किंवा अजून काही असेल!<br />४) कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त ३ जणांना खो द्यायचा. त्यांच्या ब्लॉगवर त्यांना प्रतिक्रिया देऊन तसं कळवायचं आणि शक्य असल्यास माझ्या <a href="http://aapula-samwad.blogspot.com/">ब्लॉग</a>वर मला कळवायचं. मला कळवायचा हेतू इतकाच की मी सगळ्या कड्या एकत्र करू शकीन.<br />५) तुमच्या नोंदीच्या सुरुवातीला हे नियम डकवा, तुम्ही ज्या कडीच्या पुढे लिहीताय ती कडी उतरवा, आणि शक्यतो तुम्ही ज्यांना खो देताय त्यांच्या ब्लॉगची link द्या.<br /><br />आता माझी कडी:<br /><br />रस्त्यातल्या फुलांचा<br />धुंद गंध दरवळला<br />मुक्काम तिथेच हरवला!<br /><br />आणि माझा खो <a href="http://samvedg.blogspot.com/">संवेद</a>, <a href="http://sagars.blogspot.com/">सागर</a> आणि <a href="http://khoopkaahee.blogspot.com/">चक्रपाणि</a>ला.<br /><br />ता. क. : <a href="http://e-saee.blogspot.com/2008/09/blog-post.html">सईनी हायकूवर </a>एक छान नोंद मांडली आहे!<div class="blogger-post-footer">???? ??? ???? ????| ???? ???? ? ??????||</div>Sumedhahttp://www.blogger.com/profile/16250876354718364108noreply@blogger.com15tag:blogger.com,1999:blog-21680120.post-16564897999073307232008-08-24T09:23:00.000-07:002008-08-24T13:23:06.953-07:00आवडलेले थोडे काही<a href="http://samvedg.blogspot.com/2008/08/blog-post_20.html">संवेद</a>नी सुरु केलेला खो-खो <a href="http://kshiprasuniverse.blogspot.com/2008/08/blog-post.html">क्षिप्रा</a> कडून माझ्यापर्यंत पोचला!<br /><br />संवेदचे नियम इथे परत देते:<br /><br />१. कविता आवडते पण पुर्ण आठवत नाही आणि हाताशी पुस्तकही नाही? हरकत नाही, आठवतं तेव्हढं लिहा. कवीचं नाव मात्र आवश्य लिहा<br />२. एक से मेरा क्या होगा सिन्ड्रोम? या वेळी तुम्ही तुमच्या सध्या आवडणारया टॉप २ कविता लिहु शकता आणि कवितांच्या प्रमाणात खो देखील देऊ शकता. जेव्हढ्या कविता तेव्हढे खो (जास्तीजास्त अर्थात २)<br />३. खो खो नीट चालवण्याची जबाबदारी अर्थात सारयांचीच. त्यामुळे तुमच्या पोस्ट मधे तुम्ही ज्या/जिला खो देताय, त्या/तीचं नाव तर लिहाच, शिवाय त्या/तिच्या ब्लॉगवर ही खो दिल्याची नोंद आवश्य करा<br />४. कविता का आवडली किंवा कवितेचा अर्थ किंवा काहीच स्पष्टीकरण आपेक्षित नाही<br />५. अजून नियम नाहीत :)<br /><br /><br />जोगीण<br /><br />साद घालशील तेव्हाच येईन<br />जितकं मागशील तितकंच देईन<br />दिल्यानंतर देहावेगळ्या<br />सावलीसारखी निघून जाईन!<br /><br />तुझा मुकुट मागणार नाही<br />सभेत नातं सांगणार नाही<br />माझ्यामधल्या तुझेपणात<br />जोगीण बनून जगत राहीन!<br /><br />- कुसुमाग्रज<br /><br /><br /><br />तुझ्या एका हाकेसाठी<br /><br />तुझ्या एका हाकेसाठी,<br />किती बघावी रे वाट,<br />माझी अधिरता मोठी<br />तुझे मौन ही अफाट!<br /><br />तुझ्या एका हाकेसाठी,<br />उभी कधीची दारात,<br />तुझी चाहूलही नाही<br />होते माझीच वरात!<br /><br />आले दिशा ओलांडून,<br />दिली सोडून रहाटी<br />दंगा दारात हा माझा,<br />तुझ्या एका हाकेसाठी!<br /><br />तुझ्या एका हाकेसाठी,<br />साद मीच का घालावी?<br />सात सुरांची आरास,<br />मीच मांडून मोडावी!<br /><br />- यशवंत देव<br /><br /><br />माझा खो <a href="http://vattelte.blogspot.com/">प्रिया</a> आणि <a href="http://dhyaas.blogspot.com/">सारिका</a>ला!<div class="blogger-post-footer">???? ??? ???? ????| ???? ???? ? ??????||</div>Sumedhahttp://www.blogger.com/profile/16250876354718364108noreply@blogger.com5tag:blogger.com,1999:blog-21680120.post-42884580814569621282008-08-05T23:49:00.000-07:002008-08-06T22:02:08.187-07:00खेड्यामधले...हे सगळं का आठवलं तेच आठवेना...<br /><br />छोटासा गाभारा. मधोमध शंकराची पिंडी. दोन्ही बाजूच्या भिंतींवर चौकोनी खिडक्या, कधीच बंद न होणार्या. अंगाचं मुटकुळं करून बसता येईल (म्हणजे तेव्हा तरी यायचं, लहानपणी हो!) इतक्या रुंदीच्या. पण या सगळ्यापेक्षा ते देऊळ आठवलं की फक्त तो भरून राहिलेला वास आठवतो. तेलाच्या दिवाच्या विझत आलेल्या वातीचा वास. त्यात मिसळलेला धुपाचा वास. त्यात मिसळलेला फुलांचा सुकलेला वास. आणि थोडासा बेलपत्रांचा हिरवट वास. ह्यॅ! तसला वास फक्त स्मरणातच आहे आता.<br /><br />सटाण्याचं जुनं घर. रस्त्यापासून चार पायर्या चढून वर उंचावर. घराला काटकोनात ते देऊळ. देवळासमोरचा नंदी अगदी अंगणातच. घराचा मोठा दरवाजा, मधली बैठी खिडकी, बैठक. बैठकीत कोपर्यात जुनं कपाट आणि जुनं डेस्क. वरचा उघडा माळा, म्हणजे तिथून थेट बैठकीत उडी मारता येईल असा.<br /><br /><p>मग बैठकीतून आत गेलं की वर जायला जिना आणि डावीकडे प्रचंड मोठं मधलं घर, कायमच अंधारलेलं. त्या जिन्यात एक छोटी गजांची खिडकी, त्यातून छान दिसणारा मधल्या घराचा मोठा भाग. कित्ती वेळा त्या खिडकीत गर्दी करून, या पायावरून त्यापायावर ताटकळत मोठ्या पुरुष लोकांची जेवणं व्हायची वाट बघत बसणारी आम्ही मुलं. मधल्या घरातून डावीकडे छोटी खोली, आजोबांची. आणि उजवीकडे स्वयपाक घर. स्वयपाक घरातून मागे गेलं की माजघर, मग मागचं अंगण. तिथेच कोपर्यात मोरी. एकीकडे बुजलेली विहीर, पण आईच्या आठवणीत असलेलं आणि तिथे उभे राहून नुसतंच कल्पना केलेलं ते विहीरीतून पाणी शेंदणं.<br /><br />स्वयपाकघरातल्या चुलीचा धूर. शेणानी सारवलेली जमीन. हे थोरलं देवघर - अंधारं, खोल, पण आत डोकावताच शांत वाटणारं. जेवणाच्या पंक्तींच्या पत्रावळी आणि द्रोण. कुठेकुठे भिंतीत कोनाडे, त्यात कुठे घड्याळ, कुठे चंची, कुठे वाती होण्याची वाट बघत बसलेला कापूस, कुठे वाळून कोरड्या झालेल्या अमृतांजनची बाटली!<br /></p>जिन्यावरून चढून गेलं की डावीकडे मोठी झोपायची खोली. खोलीच्या खिडकीतून दिसणारं मागचं अंगण. एका बाजूला तो उघडा माळा ज्यातून खालच्या बैठकीवर उडी मारता आली असती. या खोलीत अगदी हलक्या पावलानी चालायचं. उड्या मारणं नाचणं तर दूरची गोष्ट. कारण जरा जोरानं पावलं टाकली तर खाली मधल्या घरात माती पदते अशी वदंता! आजोबांच्या धाकानं ते खरं की खोटं हे पडताळुन बघायची कोणाची हिंमत असणार!<br /><br />आणि जिन्यातून उजवीकडे उघडा मोठा ढाबा. त्यावर मोकाट उगवलेलं गवत. त्या ढाब्यावरून थेट पुढच्या अंगणात उडी मारता येईल, म्हणून आम्हा लहान पोरांना तिथे न जाण्याची ताकीद, आणि म्हणूनच आमची मोठ्यांची नजर चुकवून तिथे जाण्याची धडपड. दादा लोक तिथे आपण सर्रास जात असल्याची फुशारकी मिरवणारे!<br /><br />संध्याकाळी देवळात जमणार्या पोरी बाळी. बरोबर आणलेले पितळीचे दिवे मातीनं घासून लख्ख करणार्या. देवळात दिवा लावून खिदळत शिवणापाणी खेळणार्या. परकराचे ओचे बांधून देवळासमोरच्या ओबडधोबड नंदीभवती लंगडी घालणार्या. अंधार पडून दिसेनासं होईपर्यंत पायानी धूळ उडवत गलका करत राहणार्या.<br /><br />हे सगळं का आठवलं तेच आठवेना...<br /><br />आठवणींना कुठे लागतात निमित्तांचे हिंदोळे?<div class="blogger-post-footer">???? ??? ???? ????| ???? ???? ? ??????||</div>Sumedhahttp://www.blogger.com/profile/16250876354718364108noreply@blogger.com9tag:blogger.com,1999:blog-21680120.post-91621517421790935952008-06-13T12:13:00.000-07:002008-06-13T16:08:49.720-07:00पाणीच पाणी ...पाणी, विपुल पाणी.<br /><br />खळाळतं पाणी, स्तब्ध पाणी.<br /><br />शांतपणे वाहणारं, गर्जना करणारं, नुसतंच धीरगंभीर.<br /><br />काहीतरी नातं आहे जरूर. जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी पाण्याच्या जवळ गेलं की ते नातं उब देत राहतं. मग ती अगदी लहानपणी कोलाडच्या नदीत मारलेली डुबकी असेल. एका पावसाळ्यात पुण्याच्या बालगंधर्व पुलावरून पाहिलेली, कधी नव्हे ते भरभरून वाहणारी मुठा असेल. किंवा खळखळत खिदळत जाणारी स्फटिक शुभ्र हृषिकेशची गंगामाई असेल! आणि देशोदेशीच्या हौशी पर्यटकांबरोबर घेतलेल्या बोट राइड मधून अगदी ओझरतीच भेटलेली सेंन नदी, थेम्स् नदी, सिंगापूर नदी असेल.<br /><br />भीमाशंकर असेल, होगानिकल असेल, किंवा जगप्रसिद्ध नायगरा! उंचीवरून कशाची पर्वा न करता कोसळणारं पाणी! मुबलक पाणी! आपलाच आवाज आपल्याला ऐकू न येईल इतकी गर्जना करणारं मोठं आणि केसांच्या बटांमधे अडकून चिमुकल्या मोत्यांचं रुप घेण्याइतकं छोटं!<br /><br />आणि आपल्यात बाकी सार्यांना सामावून घेणार्या खुळ्या सागराबद्दल तर काय बोलावं. गणपतीपुळ्या पासून कन्याकुमारी पर्यंत आणि चौपटीपासून हाफमून बे पर्यंत. वेगवेगळी रूपं पण एकच गाज. वेगवेगळे रंग, कुठे उगवतीचे कुठे मावळतीचे, कधी चमचमणारे चंचल तर कधी शांत, गंभीर; पण एकच अस्तित्त्व.<br /><br />सगळंच तर पाणी. आपल्या सहवासानी शांत करणारं. पाण्याशी नातं म्हणलं ना ते हे. एकांताचं. कुठेही कधीही पाण्याला भेटायला गेलं की भोवती किती का गर्दी असेना, "हा संवाद फक्त आपल्या दोघांचा हं" असं म्हणणारं. आपलं अस्तित्त्व विरघळून टाकणारं. खळखळाटातून संगीत, तरंगांतून रंग आणि लहरींतून आकाराची भाषा बोलणारं नातं.<br /><br />याच नात्याच्या अनुभूतीतून अरती प्रभूंना सुचलं असेल का?<br /><br /><br />पाणी स्तब्ध आहे ...<br />त्याने आपल्या रंगाची चिरगुटें<br />सांजउन्हासारखी वाळत घातली आहेत<br />काठाकाठावरील बाळमुठींनी घडवलेल्या<br />वाळूच्या मनोर्यांवर .<br />पाण्याखालचा तळ तरंगापासून अंतरंगापर्यंत<br />त्याही पल्याड आरसा होऊ पहात आहे;<br />होडी सुद्धा पायांतळी<br />सांजउन्हाची साखळी सोडून उभी आहे<br />सनईच्या सादेसाठी.<br />स्तब्ध आहे ... पाणी स्तब्ध आहे ...<div class="blogger-post-footer">???? ??? ???? ????| ???? ???? ? ??????||</div>Sumedhahttp://www.blogger.com/profile/16250876354718364108noreply@blogger.com6tag:blogger.com,1999:blog-21680120.post-12731061147989640112008-04-13T10:19:00.000-07:002008-04-15T13:22:31.663-07:00प्रश्न तत्त्वाचा आहे..परवा एका मित्राचं पत्र आलं होतं. साहेबांनी फारच मनावर घेउन, पेटून वगैरे लिहीलं होतं. बाकी तपशील जाउद्या, पण स्वत:च्या मनाविरुद्ध घरात काही धार्मिक कर्मकांड करावं लागल्यामुळे झालेली चिडचीड पत्रात अगदी पुरेपूर दिसत होती. आणि एक पराभव आणि अपमान झाल्याचा सूरही.<br /><br />आपल्या मनाविरुद्ध कुठलीही गोष्ट करावी लागणं यातून होणारा त्रास कधी ना कधी सगळ्यांना अनुभवावा लागतो. त्यातून जर "प्रश्न तत्त्वाचा" असेल तर मग विचारायलाच नको! म्हणजे या मित्राच्या बाबतीत, कर्मकांडांना त्याचा तत्त्वत: विरोध असूनही केवळ घरच्या बाकीचांच्या आग्रहावरून त्याला माघार घ्यावी लागली हे तर स्पष्ट आहे. पण मग त्याची पराभूत मन:स्थिती, राग आणि अपमान कितपत समर्थनीय आहे हे मला कळेना. आपल्या जवळच्या, प्रिय व्यक्ती, कुटूंबीय यांच्या साठी आपल्या तत्त्वांना मुरड घालावी लागणे हा पराभव समजावा का?<br /><br />आणि त्याहीपलिकडे हा पराभव आपला आहे की तत्त्वाचा? मुळात इतका अपमान होण्याइतके आपण मोठे आहोत का? असू, तर मग ज्यांकडून आपला पराभव झाला (असं आपल्याला वाटंतय्) ते आपल्याहीपेक्षा आणि आपल्या "तत्त्वा"पेक्षा मोठे असणार नं? आणि नसू, तर असं धुसफुसत रहाण्यापेक्षा, आपल्याला अजून बरंच मोठं व्हायचं आहे असं समजावं का?<br /><br />केवळ तत्त्वासाठी मैत्र्या, नाती तुटलेली आपण बघतोच की. पण नात्यांसाठी तत्त्वांना मु्रड घातलेलीही बघतो. मग नात्यांमधला कडूपणा स्वीकारून "तत्त्वनिष्ठा" जपणारे आपण की नात्यांचं मोल तत्त्वांपेक्षा वरचढ ठरवणारे आपण? आणि बाकी वेळेला तत्त्वांचा उदो उदो करत फिरणारे जेव्हा नात्यांसाठी तडजोड करतो, तेव्हा दांभिक होतो का आपण? आणि काळाच्या ओघात नात्यांची उलथापालथ होऊ शकते, तशीच तत्त्वं सुद्धा बदलणार नाहीत याची काय हमी?<br /><br />मित्राची मारे अशाच काही शब्दात समजूत घालून मी मोकळी झाले. पण माझ्यावर अशी वेळ आली की हे प्रश्न भेडसावत रहाणार ही जाणीवही झाली.<br /><br />शेवटी प्रश्न तत्त्वाचा आहे...<br /><br />नाही, ज्याच्यात्याच्या तत्त्वाचा आहे!!<div class="blogger-post-footer">???? ??? ???? ????| ???? ???? ? ??????||</div>Sumedhahttp://www.blogger.com/profile/16250876354718364108noreply@blogger.com14tag:blogger.com,1999:blog-21680120.post-2080523387323044022007-12-17T18:46:00.001-08:002008-02-20T16:01:14.613-08:00नाताळ आणि दिवाळीदुकाना दुकानातून भरगच्च सजावटी आणि ताजा माल. सगळीकडे "साले का मेला" लागलेला. सणासाठी खरेदीची गडबड, गर्दी आणि उत्साह. आपापल्या पर्सा, पिशव्या आणि पोरं सांभाळत "हे घेऊ की ते" या विवंचनेत हिंडणार्या ताया, मावश्या, आज्या ... :) पुण्याचा लक्ष्मी रस्ता असूदे, लंडन मधला ऑक्सफर्ड स्ट्रीट नाहीतर सान फ़्रान्सिस्को मधला युनियन स्क्वेअर! सणासुदीला जवळपास असंच चित्र दिसतं! सण कुठला का असेना जगभरात सगळीकडे तोच उत्साह आणतो. घरोघरी तयार होणारे (किंवा तयार आणले जाणारे) खमंग गोड पदार्थ तोच मूड सेट करतात.<br /><br />भारतात दसरा दिवाळीचा उत्साह ओसरला की इथे नाताळची हवा सुरु झाली. या दिवसात कधीही रस्त्यावर बघितलं तर दर पाच दहा मिनीटाला एखादी तरी गाडी टपावर ख्रिसमसचं झाड आणि पोटात उत्साही पोरं घेऊन जाताना दिसतीये. आपल्या घरातल्या साजर्या होणार्या सणात निसर्गाला सामावून घ्यायची काय ही हौस! ते बघताना मला थेट दसर्याची झेंडूची फुलं, पाडव्याच्या आंब्याच्या डहाळ्या आणि कडूलिंबाचा कोवळा पाला आठवला... म्हणजे आपल्या आणि पाश्चात्य जगात सणोत्सवांमधे खरेदी, गोडधोड पदार्थ आणि सुट्टी यापलिकडे असलेलं हे साम्य आत्तापर्यंत माझ्या तरी लक्षात आलं नव्हतं.<br /><br />की घराच्या, "आपल्या" संस्कृतीच्या आठवणीनी जीव व्याकुळ होत असताना आपल्याच मनानी हे साम्य शोधून नकळत घातलेली ही समजूत होती कळेना. हे म्हणजे शेजारच्या गोड म्हातारीला "एलायझा आजी" (ट्युलिप, वाचतीये बरं तुझ्या नवीन नोंदी), सहकर्याला "जानराव" आणि Fair Oaks Apartment ला "ओकवाडी" म्हणण्यासारखं! आपल्या भोवतालच्या परकेपणात आपलेपण शोधणं काही फार अवघड नाही!<br /><br />या वर्षी एक miniature का होईना, Christmas Tree आणावं म्हणते!<div class="blogger-post-footer">???? ??? ???? ????| ???? ???? ? ??????||</div>Sumedhahttp://www.blogger.com/profile/16250876354718364108noreply@blogger.com13tag:blogger.com,1999:blog-21680120.post-27228916600066623202007-12-02T09:34:00.000-08:002008-02-20T16:01:00.416-08:00बालपणीचा ...लहानपणीच्या आठवणींचा खजिना आपल्या सगळ्यांकडेच असतो. तो उघडून उधळायला कुठलेही निमित्त चालते, किंवा कधी कधी निमित्तही नाही लागत..<br /><br />माझ्या बालपणीच्या खजिन्यातली ही चीज परवा बाहेर यायला निमित्त होता माझा गोड भाचा!<br /><br />कोणाला या कवितेचे कवी माहीत आहेत का?<br /><br /><br />"शाळेत नाही जायचं येतं मला रडू<br />आई मला शाळेत नको न धाडू"<br />कोण बरं बोललं रडत हळू हळू?<br />दुसरं कोण असणार हा आमचा बाळू!<br /><br />आई मग म्हणाली "शहाणा माझा राजा,<br />शाळेत गेलास तर देईन तुला मजा!<br />शाळेत नाही गेलास तर हुषार कसा होशील?<br />बाबांच्यासारखा कसा इंग्लडला जाशील?<br /><br />आपला रामा गडी शाळेत नाही गेला,<br />म्हणूनच भांडी घासावी लागतात न त्याला?<br />तू कोण होणार डॉक्टर की गडी?<br />बाबांच्या सारखी ऐटबाज नको का तुला गाडी?"<br /><br />रडत रडत म्हणाला बाळू आमचा खुळा<br />"होईन मी गडी, नको मला शाळा!"<div class="blogger-post-footer">???? ??? ???? ????| ???? ???? ? ??????||</div>Sumedhahttp://www.blogger.com/profile/16250876354718364108noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-21680120.post-30659105898288093302007-11-20T19:06:00.000-08:002007-11-20T19:26:13.432-08:00जे जे उत्तम ...नंदननी सुरु केलेला हा "खो-खो" माझ्या पर्यंत पोचून बरेच दिवस झाले (धन्यवाद मिनोती!). दरम्यान काही मित्र-मैत्रिणींनी बरेच काही उत्तमोत्तम प्रसिद्ध सुद्धा केलंय. जरा उशीरच झाला, पण "better late than never" या उक्तीप्रमाणे माझा आवडता उतारा.<br /><br /><br />खोलीत येऊन ज्योडीनं दार लावून घेतलं. फाटका शर्ट आणि पाटलोण काढून टाकून तो उबदार पांघरुणात शिरला. अंथरुण मऊ गुबगुबीत होतं. त्यानं आरामात पाय लांब केले. सकाळी लवकर उठलं पाहिजे. दूध काढायचं आहे, लाकडं आणायची आहेत, शेतात काम करायचं आहे. शेतातली कामं उरकताना आजूबाजूला खेळायला-बागडायला आता फ्लॅग नाही. कामातला कठीण वाटा शिरावर घ्यायला आता बाप नाही. पण त्याची काय पर्वा? आपण एकट्यानं सांभाळू सारं.<br /><br />ज्योडी कसली तरी चाहूल घेत होता. त्याला फ्लॅगची चाहूल हवी होती. घराभोवती धावताना... खोलीच्या कोपर्यातल्या शेवाळाच्या अंथरुणावर चाळवताना... पण आता ती कधीच ऐकू येणार नव्हती. फ्लॅगच्या देहावर आईनं माती लोटली असेल का? की गिधाडांनी त्याचा चट्टा मट्टा केला असेल? फ्लॅगवर आपण जेव्हढं प्रेम केलं तेवढं जगातल्या कुठल्याच पुरुषावर, बाईवर - इतकंच काय पोटच्या पोरावर सुद्धा आपण करू शकणार नाही. आयुष्यभर आपण आता एकटे. पण नशिबी असेल ते भोगावं आणि पुढची वाट धरावी.<br /><br />झोपता झोपता तो ओरडला, "फ्लॅग!"<br /><br />पण हा आवाज त्याचा नव्हता. तो एका कोवळ्या पोराचा आवाज होता. बावखोलापलिकडे, मॅग्नोलियाच्या झाडाच्या पुढं, ओकच्या झाडांखालून एक पोरगा आणि एक हरणाचा पाडा जोडीनं धावत गेले आणि कायमचे अंतर्धान पावले.<br /><br /><br />- पाडस - राम पटवर्धन<div class="blogger-post-footer">???? ??? ???? ????| ???? ???? ? ??????||</div>Sumedhahttp://www.blogger.com/profile/16250876354718364108noreply@blogger.com6tag:blogger.com,1999:blog-21680120.post-76002346624100098322007-08-24T22:20:00.000-07:002007-08-24T23:20:35.101-07:00खोडसकाळच्या उन्हात कॉफी घेत घराच्या पायरीवर उभी होते. रविवारची आळसावलेली सकाळ. हे घर असं टेकाडावर. आजूबाजूला बैठी टुमदार म्हणावी अशी घरं. मागे वर थोडीशी चढत जाणारी टेकडी, आणि घनदाट होत जाणारी झाडी. समोर तीच उतरत जाणारी टेकडी, थोडी घरं आणि मग समोरच्या परिसराला कापत जाणारा रेल्वेमार्ग, पलिकडे आडवा पसरलेला महारस्ता. त्याही पलिकडे औद्योगिक इमारतींचा पट्टा. मधेच एक-दोन अलिशान हॉटेलं. या परिसरात कामाला येणार्यांची नेहेमीची विश्रांतीस्थानं. त्याहीपलिकडे खाडी. आणि खाडीच्या पलिकडे? आहेत की क्षितिजावर निळे डोंगर! छानपैकी अस्ताव्यस्त पसरलेले. बापरे घराच्या पायरीवरून इतकं सगळं दिसतं हे लक्षातच आलं नव्हतं कधी! इथे घटकाभर बसून हे सगळं साठवून ठेवायलाच पहिजे डोळ्यांत! <br /><br />महारस्त्यावरून जाणार्या वाहनांचा आवाज एकदम जाणवला. म्हणजे इतका वेळ वर्दळ नव्हती असं नाही. पण अचानक कोणीतरी कळ फिरवावी तसा तो आवाज आपल्या अस्तित्त्वाची जाणीव करून द्यायला लागला. आणि मग अचानक सगळेच आत्तापर्यंत फक्त दिसणारे आवाज ऐकू सुद्धा यायला लागले. वार्यानी हलणारी पानं सळसळ आवाज करतायत होय. आणि पलिकडच्या मैदानावर खेळणारी चालत्या बोलत्या बाहुल्यांसारखी दिसणारी मुलं आरडाओरडा सुद्धा करतायत. गंमत म्हणजे आत्तापर्यंत फक्त ऐकू येणार्या गोष्टी दिसायलासुद्धा लागल्या. इतका वेळ नुसतीच चिवचिव करणारी पाखरं चक्क पानांआडून डोकवायला लागली. शेजार्यांच्या हिरवळीवर लावलाय पाण्याचा फवारा, तो एकदमच उन्हात चमकायला लागला.<br /><br />मला गंमत कळेना. या अचानक माझ्या दुक-श्राव्य संवेदना अशा तीक्ष्ण कशा झाल्या? पलिकडच्या गल्लीत एक गाडी येऊन थांबली. गराजचे दार उघडून आत गेली. गराज बंद झालं. वार्याच्या झुळुकेनी रस्त्याच्या या कडेचा पाचोळा फरफटत त्या कडेला गेला. आणखी एक गाडी टेकडीवरून येतीये, मी बरोब्बर वळून बघितलं त्या क्षणी समोरून वळसा घेऊन खालच्या रस्त्याला लागली ती. मागच्या बाजूला रहाणारे आजोबा नेहेमीप्रमाणे अडगळीतच्या जुन्या पान्या वस्तू काढून काहीतरी खाटखुट करत बसलेत. आणि इतका वेळ नुसताच चिवचिवाट ऐकू येत होता, ते एकूण चार, नाही पाच असावेत बहुतेक, वेगवेगळे पक्षी आपापल्या ताला-सुरात गातायत हेही लक्षात आलं. समोरच्या निळ्या फुलांच्या वाफ्यात मधेच नाजूक गुलाबी फुलं पण आहेत. आणि पलिकडच्या अंगणात दगडगोट्यांनी सजवलेलं ते कारंजं म्हणजे दोन सुबक मासोळ्या आहेत.<br /><br />हे सगळं आधीपासून होतं, चालूच होतं की. पण दिसलं नाही, आणि ऐकू सुद्धा आलं नाही. आपल्याला हव्या त्या गोष्टी ऐकायची आणि बघायची, नाही चुकलं.... आपल्याला नको त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायची भारी खोड आहे हे खाडकन जाणवलं. आणि ठरवलं रोज घरातून बाहेर पडताना पायरीवर दोन क्षण थांबायचं, डोळे मिटून ऐकायचं, कान बंद करून बघायचं. खूप काय काय दिसतं आणि ऐकू येतं, तेही रोज नवीन नवीन! करून बघा, मजा आहे!<div class="blogger-post-footer">???? ??? ???? ????| ???? ???? ? ??????||</div>Sumedhahttp://www.blogger.com/profile/16250876354718364108noreply@blogger.com10tag:blogger.com,1999:blog-21680120.post-38401229157234885602007-08-17T21:49:00.000-07:002007-08-17T22:01:53.699-07:00वास नाही ज्या फुलांना"ब्लॉगली नाहीस बर्याच दिवसात?", माझे ब्लॉग अत्यंत सहनशीलतेने झेलणार्या प्रिय मैत्रिणीकडून विचारणा झाली. ब्लॉगायला काही कारण लागत नाही, पण ब्लॉग न लिहायला बरीच आहेत की! "खूप दिवसात काही लिहीले नाही, लिहायला तर बसले आहे, पण काय लिहावे सुचत नाही" अशा अर्थाची एक नोंद टाकावी हा मोह आवरता घेते. "चांदणवेल" समोर पडलं आहे, त्यातलं कुठलंतरी पान उघडते..<br /><br />वास नाही ज्या फुलांना फक्त ती पाहून घे,<br />धुंद आहे गंघ ज्यांना तो तिथे जाऊन घे.<br /><br />चांदणे लाटात जेथे साजल्या वाळूमधे,<br />रात्र संपेतो इमाने गीत तू गाऊन घे.<br /><br />प्रीत जेव्हा जागणारी सर्वभावे वाहते<br />बाहुंचा वेढा तिचा तू साहसे साहून घे.<br /><br />वाढत्या ग्रीष्मात जेव्हा मेघ माथी कोसळे<br />सारुनी संकोच सारा त्यांत तू न्हाऊन घे<br /><br />नेम ना लागेल केव्हा तुष्टतेची वाळवी :<br />वाळण्या ती या जगाचें दु:ख तू लावून घे.<br /><br />वाटतां सारेंच खोटें, प्रेमनिष्ठा आटतां,<br />एकटा अंतर्गृहींच्या ज्योतिने दाहून घे.<br /><br />-बा. भ. बोरकर<div class="blogger-post-footer">???? ??? ???? ????| ???? ???? ? ??????||</div>Sumedhahttp://www.blogger.com/profile/16250876354718364108noreply@blogger.com4tag:blogger.com,1999:blog-21680120.post-48988493616923652102007-07-25T09:11:00.001-07:002007-07-25T09:56:07.161-07:00Dementor and Patronusआभाळ गच्च भरून आलेलं असतं. अगदी उदास वाटतं. मग वाफाळलेला कॉफीचा कप घ्यावा आणि लताचं "ओ सजना" लावावं. बस! उदास वातावरण एकदम जादुइ होऊन जातं! धो धो पाउस येऊन कधी आकाश मोकळं करून जातो समजतही नाही!<br /><br />कामाला काही म्हणता सुर सापडत नसतो. नको असलेल्या गोष्टी पुढयात येत असतात आणि सोप्या सोप्या ठिकाणी पण घोडं अडतं. मग याहू वर "काय म्हणताय, काय चाललंय्?" असा संदेश पाठवावा! फुटकळ चकाट्या पिटायला वेळ नाही हे विसरून मस्त गप्पा टप्पा व्हाव्यात. पुढचा दिवस कसा सुरळीत जातो.<br /><br />आपल्या मागे लागलेल्या लहान-मोठ्या demontors ना पळवून लावायला आपल्याच पोतडीत असतात की लहान मोठे patronus. एक इशारा पुरे असतो, जादूची कांडी सुद्धा नाही लागत.<br /><br />एक मिनिट, हॅरी पॉटर न वाचणार्या पामरांनो (sigh, you don't know what you are missing!), तुम्हाला काय सांगणार कप्पाळ की dementor म्हणजे काय आणि patronus कोण! पण तुम्ही हे गाणं तर नक्कीच ऐकलं असेल न?<br /><br />When the dog bites, when the bee stings, when I am feeling sad!<br />I simply remember my favourite things,<br />And then I don't feel so bad!<br /><br />हे सुद्धा गाणं माहीत नाही तुम्हाला? आता मात्र हद्द झाली! मग पाडगावकर काय म्हणतात बघा<br /><p>कधी कधी सगळंच कसं चुकत जातं!<br />नको ते हातात येतं, हवं ते हुकत जातं!<br />अशा वेळी काय करावं?<br />सुकलेल्या झाडाला न बोलता पाणी द्यावं!<br /></p><p>यालाच आपली J. K. म्हणते dementor ला पळवून लावायला patronus बोलवायचा! पुढच्या वेळी तुमच्या मागे लागलाच कोणी dementor, तर सहजी बोलवून आणा तुमच्या patronus ला! आता कळलं?<br /></p><div class="blogger-post-footer">???? ??? ???? ????| ???? ???? ? ??????||</div>Sumedhahttp://www.blogger.com/profile/16250876354718364108noreply@blogger.com11tag:blogger.com,1999:blog-21680120.post-15780684363749672452007-06-15T23:27:00.001-07:002007-06-16T09:49:11.371-07:00आतलं वर्तुळकॉलेजमधे असताना मैत्रिणींचे वाढदिवस जोरात साजरे व्हायचे. संध्याकाळी वाढदिवसाळू मैत्रिणीकडे धाड असायची. किलोनी पावभाजी (किंवा इडली-सांबार किंवा भेळ इ. इ.) आणि लिटरनी मिल्क-शेक (किंवा आइसक्रीम किंवा पियुश इ. इ.) तयार करणे हा आईचा न सांगता आखलेला आणि अर्थातच पार नेलेला पाककार्यक्रम असे! या धाडीमधे शाळेतल्या, कॉलेजमधल्या, गल्लीतल्या, क्लासमधल्या ज्या ज्या मैत्रिणींना वाढदिवस लक्षात असेल त्या सर्व सामील असायच्या. भेट म्हणून फक्त एक ग्रीटिंग कार्ड आणावे हा अलिखित नियम. एका वर्षी तर मला आठवतेय इतक्या मैत्रिणी एकदम आल्या की घरात जागाच नव्हती बसायला! हळूहळू सगळ्या पांगल्या, फक्त "घट्ट", सख्ख्या मैत्रिणी रेंगाळल्या. इतका वेळ आतल्या खोलीत तोच पेपर पुन्हा पुन्हा चाळत बसलेले पपा बाहेर डोकाऊन म्हणाले "अरे वा, आता फक्त 'inner circle' उरलंय वाटतं"...<br /><br />तर मैत्रिची अशी वर्तुळं असतात खरी. म्हणजे आतलं वर्तुळ अधिक महत्त्वाचं किंवा बाहेरचं कमी दर्जाचं असं नाही. पण काही मैत्र्या अमुक एका त्रिज्येच्या आत जातच नाहीत हे मात्र खरं. अगदी कायमस्वरुपी मैत्री असेल तरीही. गंमत म्हणजे या वर्तुळांचा विस्तार कमी जास्त होतो, त्यात लोक प्रवेश करतात, क्वचित सोडूनही जातात; पण अगदी आतलं वर्तुळ तसंच राहतं. किंबहुना, या वर्तुळात फक्त प्रवेश करता येतो, बाहेर पडता येत नाही हेच त्याचं वैशिष्ट्य! आणि या वर्तुळात कोण असेल यालाही काही नियम नाहीत. म्हणजे फक्त अंतरानी जवळ असलं तरच या वर्तुळाची "membership" मिळते असं नाही. आणि तुम्ही पत्र-फोन-इमेल वर संपर्कात असाल तरच मिळते असंही नाही. इतकंच काय जितकी मैत्री जुनी तितके तुम्ही आतल्या वर्तुळात जाल याचाही नेम नसतो.<br /><br />पण या आतल्या वर्तुळातले मित्र असतात तरी कोण? तुम्ही कधीही, कितीही काळानंतर, कुठूनही, कु्ठल्याही अवस्थेत या मित्राला संपर्क केलात तरी जन्मोजन्मीचं नातं असल्यासारखे एका क्षणात संवाद जोडू शकता. मधला काळ, अंतर नाहीसं होतं. फार काही शब्दांची देवाण-घेवाण करावी लागत नाही. "ए तुला आठवतं" किंवा "किती दिवसांनी बोलतोय आपण" असले संभाषण जोडणारे पूलही लागत नाहीत! आपण स्वत:शी संवाद करावा तसा मोकळा संवाद सहज होऊ शकतो.<br /><br />अगदी लहानपणी विशाल असणारं हे वर्तुळ कळत नकळत संकुचित होत जातं खरं! पण न कळत्या वयातसुद्धा कुठेतरी पुसटसा परिघ आखलेला असावा बहुतेक. अशीही लहान मुलं दिसतातच की जी काही अनोळखी लोकांकडे सुद्धा सहज झेपावतात, पण अगदी जवळच्या नातेवाइकांकडेही रमत नाहीत! मोठेपणी तर, अगदी माणूस कितीही जगन्मित्र झाला, तरी प्रत्येकाचं आतलं वर्तुळ कधीतरी कुठेतरी आखलेलं असतं असा माझा दावा आहे. कोणाचं जरा अधिक गजबजलेलं असेल कदाचित इतकंच.<br /><br />तेव्हा पपांना मी "छे! inner circle वगैरे काही नाही, सगळ्या सारख्याच मैत्रिणी आहेत" असं म्हणाल्याचं आठवतंय. त्यात कुठेतरी आपण जगन्मित्र (जगन्मैत्रीण म्हणा हवं तर) वगैरे असल्याची पोकळ पौढी किंवा सूप्त इच्छा असेल कदाचित. किंवा वर्तुळांची ही भूमिती तेव्हा उमजली नसावी. आता नकळत आपली आपल्यालाच ती वर्तुळं दिसायला लागली आहेत. यालाच वयानी, अनुभवानी येणारं शहाणपण म्हणायचं का?<div class="blogger-post-footer">???? ??? ???? ????| ???? ???? ? ??????||</div>Sumedhahttp://www.blogger.com/profile/16250876354718364108noreply@blogger.com13tag:blogger.com,1999:blog-21680120.post-17439900214700726482007-06-11T22:11:00.000-07:002007-06-11T22:13:20.002-07:00वेडा कवीतसे सगळेच कवी वेडे असतात. म्हणजे माझ्या सगळ्याच आवडत्या कवींना मे "वेडे" म्हणते. हे अगदी पहिल्यांदा माझ्या ताईकडून शिकले. बोलगाणी अगदी ताजं कोरं होतं तेव्हा त्यातल्या या ओळी ती अगदी भाराउन जाउन वाचत होती:<br /><br />प्रेम कधी भांडतं सुद्धा<br />निळं चांदणं सांडतं सुद्धा!<br /><br />आणि मधेच थांबून म्हणाली "काय वेडे आहेत न पाडगावकर!" तेव्हा मला हसू आलं होतं. पण नंतर लक्षात आलं की अशा थेट भिडणार्या कवीला "वेडा" हाच शब्द अगदी चपखल आहे! तेव्हापासून कुठल्या ओळी मनाला भिडून गेल्या, हसवून-रडवून गेल्या, वेड लावून गेल्या की तो कवी "वेडा आहे झालं" असा विचार मनात येउन जातो.<br /><br />आज हे आठवायचं कारण, अर्थातच अजून एक महावेडा कवी! खूप दिवसांनी "मरासिम" ऐकली. गुलज़ार नावाच्या वेड्या कवीच्या या वेड्या ओळी बराच वेळ घुमत राहिल्या कानात! किती किती वेगळ्या नात्यांना, भावनांना, जाणीवांना, संवेदनांना वेड्या शब्दात सहज पकडणे एक फक्त गुलज़ारच जाणे!<br /><br /><br />मुझको भी तरकीब सिखा दो यार ज़ुलाहे!<br />अक्सर तुझको देखा है के ताना बुनते,<br />जब कोइ तागा टूट गया या ख़तम हुआ,<br />फिर से बांधके, और सिरा कोइ जोड के उसमे -<br />आगे बुनने लगते हो!<br />तेरे इस तानेमें लेकिन एक भी गांठ-गिरह बुंदरकी देख नहीं सकता कोई ...<br /><br />मैंने तो एक बार बुना था एकही रिश्ता,<br />लेकिन उसकी सारी गिरहें साफ़ नज़र आती है मेरे यार जुलाहे!<br /><br />मुझको भी तरकीब सिखा दो यार जुलाहे ...<div class="blogger-post-footer">???? ??? ???? ????| ???? ???? ? ??????||</div>Sumedhahttp://www.blogger.com/profile/16250876354718364108noreply@blogger.com4tag:blogger.com,1999:blog-21680120.post-25325963325021683412007-04-17T22:02:00.000-07:002007-06-12T14:15:33.137-07:00बी आणि खतकुठल्या न कुठल्या निमित्तानी हा कितीही उहापोह केला तरी उत्तर न मिळणारा प्रश्न डोकं काढतोच. मुळात बियाणं चांगलं असेल, तर कुठलंही खत घातलं तरी काय फरक पडतो? मुळात मातीच चांगली असेल तर सामान्य कौशल्य असलेला कुंभार सुद्धा सुबक मडकं करू शकतो का? गळा चांगला असेल तर कुठल्या गुरुकडे गेलात याल कितपत महत्त्व आहे?<br /><br />एक मात्र खरं; खत, कुंभार, गुरु यांची मुळात गरज असते हे मात्र कोणी नाकारू शकत नाही!<br /><br />तर परवा चर्चेचा विषय होता की आपल्या जडणघडणीत आपल्या शाळेचं किती योगदान असतं? आपल्या मुलाला अमुक एका शाळेतच प्रवेश मिळावा असा हट्ट धरणं खरच कितपत योग्य आहे? "अति तिथे माती" या न्यायानुसार, कुठलाच अवाजवी हट्ट धरु नये हे जरी खरं असलं, तरी शालेय शिक्षण बर्याच बाबतीत महत्त्वाचं असल्यामुळे "शाळा चांगली हवी" यात तथ्य आहे न?<br /><br />मला माझ्या शाळेचा खूप अभिमान आहे. माझ्या जडणघडणीत माझ्या शालेय शिक्षकांचा, मैत्रीणींचा आणि शाळेच्या वातावरणाचा फार मोठा वाटा आहे असं मी मानत आलेय. यात शाळेच्या दगडी जुन्या इमारती, लाकडी जिने, मोकळी मैदानं, बुचाची झाडं, भलं मोठं सभागृह, थोरलं ग्रंथालय आणि त्यातली नकाशांनी भरलेली खोली, पाण्याची टाकी सगळं आलं! दरवर्षीच्या स्पर्धा आल्या, हस्तलिखितं आली, निवडणुका आल्या, स्नेहसंमेलनं आली! "मुळात तुमच्यामधे जे काही गुणावगुण असतील त्यात शाळेच्या शिकवणुकीमुळे खरंच किती फरक पडतो?" या प्रश्नाला उत्तर देताना हे सगळं माझ्या डोळ्यापुढून भर्रकन् सरकून गेलं. या सगळ्या गोष्टींचा माझ्यावर खरंच किती ठसा उमटलाय हे व्यक्त करायला बहुतेक मी अपुरीच पडले.<br /><br />पण "तू दुसर्या कुठल्या शाळेत गेली असतीस तर खरंच तू वेगळी व्यक्ती झाली असतीस?" किंवा "तुझ्या शाळेत जाणार्या सगळ्यांनाच असं वाटतं?" या प्रश्नांचं ठाम उत्तर तर मी किंवा कोणीही देउ शकणार नाही. काहीजण स्वयंपूर्ण असतात, तर काही गुरुस्पर्शानं धन्य होतात. कधी भेट न दिलेल्या शक्यतेच्या जगात कुठलं बियाणं कसं उगवलं असतं हे कसं सांगणार?<div class="blogger-post-footer">???? ??? ???? ????| ???? ???? ? ??????||</div>Sumedhahttp://www.blogger.com/profile/16250876354718364108noreply@blogger.com6tag:blogger.com,1999:blog-21680120.post-31975937277450768852007-03-15T23:22:00.001-07:002007-03-16T11:26:18.438-07:00क्रिकेट क्रिकेटआत्तापर्यंत माझ्या इ-मेल मध्ये पाच वेळा आलेली ही ad तुम्ही नक्कीच बघितली असेल :<br /><br /><a href="http://youtube.com/watch?v=kf9tKOexxkw">http://youtube.com/watch?v=kf9tKOexxkw</a><br /><br />क्रिकेट विश्वचषकामुळे तमाम भारतीय (तमाम 'भारतीय क्रिकेटप्रेमी' म्हणणार होते, पण ती द्विरुक्तीच होईल ना!) चांगलेच "पेटलेले" आहेत. Nike वाल्यांनी अगदी बरोबर नस पकडून तयार केलीये ही ad!भारतात क्रिकेट इतका लोकप्रिय का असावा याची कारणमीमांसा काही मी नको द्यायला. लहानपणी गल्लीत क्रिकेट न खेळलेला मुलगा (क्वचित मुलगी सुद्धा) भेटणं अवघड. टी.व्ही. वर दिवस न् दिवस सामने बघणारे वीर (अर्थात वीरांगना सुद्धा) घरोघरी. दुसर्या दिवशी वार्षिक परीक्षा सुरु होत असून सुद्धा दिवसभर बोलणी खात बघितलेली मॅच मलासुद्धा अजून आठवतीये तर कट्टर क्रिकेट भक्तांची बातच नको! सुट्टीमधे सगळी भावंडं जमल्यावर क्रिकेटचे सामने हमखास रंगणारच. त्यात मुलगी असल्याने (मग ती आठ-दहा भावांमधली एकुलती लाडकी बहीण असली म्हणून काय झालं), क्रिकेट मधे कायम लिंबूटिंबू. आणि काय खेळ तरी मांडलेला असायचा, दोन बाजूची जांभळाची झाडं म्हणजे boundary, बाजूच्या आंब्याच्या झाडावर बसणार अंपायर आणि घराच्या दगडी भिंतीवर खडुने रंगवलेल्या यष्ट्या. म्हणजे बॉलवर त्या खडुच्या उठणार्या छप्प्यानी ठरवायचे आउट आहे की नाही! असा सगळाच आनंद!<br /><br />पुढे शिक्षणासाठी देश सोडल्यावर हे वेड थोडं कमी झालं. नाही म्हणायला cricketinfo.com नवीन नवीन सुरु झाली होती तेव्हा अगदी ball-by-ball सामने "बघितल्याचे" आठवतायत. पण मग हळू हळू ते पण कमी झालं. या Nike च्या जाहिरातीनं सगळं पुन्हा उजळून निघालं, "Eat cricket, sleep cricket, drink only Coca Cola" आठवलं. त्यातून विश्वचषकाचा माहोल. म्हणजे "rekindling old flame" का काय म्हणतात न, तसं झालं. आज बराच वेळ क्रिकेटच्या websites पालथ्या घालण्यात गेला, "Receive alerts on your desktop" ला sign-up केलं आणि Nike ची ad तमाम दोस्त वर्गाला पाठवली, तेव्हा कुठे जरा मोकळं वाटलं!<br /><br />आता इतकं करून भारतीय संघाला काही स्फुरण येवो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना :)<div class="blogger-post-footer">???? ??? ???? ????| ???? ???? ? ??????||</div>Sumedhahttp://www.blogger.com/profile/16250876354718364108noreply@blogger.com6tag:blogger.com,1999:blog-21680120.post-12034449496851900302007-03-10T07:31:00.001-08:002007-03-10T07:38:07.135-08:00काळ काम वेगपरवा सकाळी कामाला जाताना ट्रॅफिक सिग्नल पाशी थांबले होते. शेजारच्या गाडीकडे लक्ष गेले. शेजारच्या गाडीतले काका (खरं म्हणजे चांगला तरुण माणूस होता, पण सगळे अनोळखी लोक काका किंवा काकू असतात) "बिनपाण्याने" हजामत करत होते, स्वत:चीच हो! मला हसू आवरेना. नेमकं तेव्हाच त्यांचं पण लक्ष माझ्याकडे वळलं. मला जरा ओशाळल्यासारखं झालं, पण त्यांनी खांदे उडवत मोकळेपणानं हसत माझं लक्ष समोरच्या हिरव्या झालेल्या दिव्याकडे वेधलं! वेळेशी रोजच सकाळी उठून लढाई करणार्यांना हे काही नवीन नाही, काय? कामाच्या वाटेवर गाडीत बसून ब्रेकफास्ट करणारे, टाय बांधणारे, केस नीटनेटके करणारे काका आणि मेकप करणार्या काक्वा सर्रास दिसतात की!<br /><br />ते काका घरी वेळ झाला नाही म्हणून गाडीत दाढी करत असावेत का? की त्यांनी तशी सवयच लावून घेतली असेल, वेळ वाचवण्यासाठी? मला "चीपर बाय द डझन" ची आठवण झाली. त्यातील डॅड मुलांना आंघोळीच्या वेळी कॅसेटस् ऐकायला लावून कमीत कमी वेळात नवीन भाषा शिकवत असत. इतकेच नाही रोज करायच्या प्रत्येक कामात कसा वेळ वाचवता येईल, एकाच वेळी दोन किंवा तीन कामे कशी करता येतील, त्यातून नवीन काही कसे शिकता येईल याचा रात्रंदिवस विचार ते करत आणि अमलात पण आणत.<br /><br />माझ्या एका मित्राची यावरची प्रतिक्रिया म्हणजे "ह्यॅ, यात काय अर्थय? सारखा आपला डोक्याला भुंगा! आपल्याला नाही बुवा जमणार, आपण कसं एकदम मजेत आरामात करतो सगळं, no tension!" त्याला म्हणलं, "dude, you missed the point!" म्हणजे वेळेची गरज म्हणून अशी कसरत करणं वेगळं. पण असं एका वेळी 2-2, 3-3, किंवा 4-4 गोष्टी करून जो वेळ वाचवल्याचा, आपली कार्यक्षमता वाढवल्याचा आनंद असतो तो तुला नाही कळायचा!<br /><br />एक मात्र खरं, ही गोष्टच अशी आहे की ती रक्तात असावी लागते, शिकणं फार अवघड. ती एक कला आहे. आणि हे नुसतं वेळ वाचवण्याबाबत नाही बरंका, सगळ्याच गोष्टींच्या नियोजनाबद्दल. सकाळी उठल्यापासून माझ्या डोक्यात हा "भुंगा" चालू असतो म्हणा न. अमुक एक गोष्ट केली की तमुक गोष्ट करायची, हे झाल्याशिवाय ते होउ शकणार नाही, हे करत असतानाच ते पण उरकून घेता येईल, समजा हे जमलं नाही तर निदान ते तरी होईल, एक ना दोन!<br /><br />हे लिहीता लिहीता एक मात्र लक्षात आलं, मी मेकप करत नाही आणि दाढी पण ;) म्हणजे आता गाडी चालवताना करायला काहीतरी शोधून काढलं पाहिजे!<div class="blogger-post-footer">???? ??? ???? ????| ???? ???? ? ??????||</div>Sumedhahttp://www.blogger.com/profile/16250876354718364108noreply@blogger.com9tag:blogger.com,1999:blog-21680120.post-21712257423407898972007-02-11T19:53:00.000-08:002009-01-10T19:05:26.155-08:00कर कर कराविंदा करंदीकरांचं "भारतीय स्त्रियांसाठी लिहीलेलं स्थानगीत" परवा ऐकलं (सौजन्य : नक्षत्रांचे देणे)<br /><br />कर कर करा, मर मर मरा.<br /><br />दळ दळ दळा, मळ मळ मळा, तळ तळ तळा<br />तळा आणि जळा.<br /><br />बाज बाज बाजा, पाज पाज पाजा, पोस पोस पोसा<br />पोसा आणि सोसा.<br /><br />धू धू धुवा, शिव शिव शिवा, चिर चिर चिरा<br />चिरा आणि झुरा.<br /><br />कुढ कुढ कुढा, चिड चिड चिडा, झिज झिज झिजा<br />शिजवा आणि शिजा.<br /><br /><br />चटका बसला.<br /><br />आमची पिढी भाग्यवान. आमच्यापैकी बहुतजणींना जळावं, सोसावं, झुरावं, शिजावं लागलं नाही. (आणि हे मी फक्त सुशिक्षित मध्यमवर्गींयांबद्दल बोलतीये). हा काळाचा महिमा आहे का? की मागच्या कित्येक पिढयांनी सोसून, वेळोवेळी त्याविरुद्ध झगडून आमच्यासाठी कमावून ठेवलेलं हे पुण्य आहे? असं असताना, विंदांनी जे शब्दात मांडलं ते प्रत्यक्ष न अनुभवता देखील आम्हाला कळतं का? डोळे मिटून क्षणभर मागच्या पिढीतल्या स्त्रियांचा विचार केला की अंगावर सर्रकन् काटा येतोच न? त्यांच्या परिस्थितीच्या नुसत्या कल्पनेनं हताश झालंसं वाटतंच न? वाडा चिरेबंदी मधली "सुख मिळेना तेव्हा मीच सुखास दूर लोटून दिलं" असं म्हणणारी आई आठवते. सुन्न व्हायला होतं, रागही येतो.<br /><br />हे सगळं आम्ही कुठेतरी पाहिलंय्, आया-आज्यांकडून ऐकलंय्, स्वानुभवकथनातून वाचलंय्. मग मला प्रश्न पडला. मी जर हे असं काही सोसलं नाही, तर मला या "भारतीय स्त्रियांबद्दल" जे काही वाटतं ती <a href="http://aapula-samwad.blogspot.com/2006/09/blog-post.html">सहानुभूती</a> आहे की फक्त हळहळ? एक स्त्री म्हणून तो बसलेला चटका विंदांनी बघितलेल्या आणि म्हणून उत्कटपणे मांडलेल्या चटक्यापेक्षा वेगळा आहे का? मागच्या पिढयांमधून रक्तात वाहत आलेला वारसा आहे का? अजून काही पिढया भविष्यात डोकावून बघितलं, तर त्या भविष्यातल्या स्त्रीलाही असाच चटका बसेल? की काळाच्या ओघात ती जखम भरून निघाली असेल?<br /><br />माहीत नाही.<div class="blogger-post-footer">???? ??? ???? ????| ???? ???? ? ??????||</div>Sumedhahttp://www.blogger.com/profile/16250876354718364108noreply@blogger.com5tag:blogger.com,1999:blog-21680120.post-74015468555830932732007-01-30T15:24:00.000-08:002007-03-02T11:56:42.230-08:00कोई बात चलेसध्या गाडीत वाजतीये गुलज़ार-जगजित ची "कोई बात चले". "बात" कुछ तो ज़रूर है! पण "मरासिम" नंतर या अल्बमने अपेक्षाभंग केला असं नाही म्हणलं, तरी अपेक्षापूर्ती नक्कीच केली नाही. गुलज़ारच्या शब्दांपेक्षा जगजितच्या सुरांबाबत जास्त!<br /><br />बाकी तर ऐकून ऐकून चढतीलच काही त्रिवेणी, पण पहिल्यांदाच ऐकून ही रुतून बसलीये, अगदी typical गुलज़ार!<br /><br />उड के जाते हुए पंछी ने बस इतनाही देखा<br />देर तक हाथ हिलाती रही वोह शाख फिज़ा में<br />अलविदा कहती थी या पास बुलाती थी उसे?<br /><br />अजून एक नोंदल्याशिवाय राहवत नाही:<br /><br />उम्र के खेल में एकतर्फा है ये रस्साकशी<br />एक सिरा मुझको दिया होता तो कुछ बात भी थी<br />मुझसे तगडा भी है और सामने आता भी नहीं<div class="blogger-post-footer">???? ??? ???? ????| ???? ???? ? ??????||</div>Sumedhahttp://www.blogger.com/profile/16250876354718364108noreply@blogger.com4tag:blogger.com,1999:blog-21680120.post-13063071117198116112006-11-27T21:19:00.000-08:002007-03-07T12:54:48.048-08:00पर्याय आणि निवडस्वातंत्र्यऑफिसच्या कॅंटीनच्या मेनूसमोर उभं राहून माझी एक सहकारी तक्रारीच्या सुरात म्हणाली, "हे काय, काही सुद्धा खावंसं वाटत नाही, याला हे लोक भरगच्च मेनू म्हणतात? काही choiceच नाही!" मेनूवर साताठ वेगवेगळे "पर्याय" असूनसुद्धा.<br /><br />पर्याय ही मोठी मजेशीर गोष्ट आहे. भरगच्च पर्याय हे पुरेशा निवडस्वातंत्र्याचं निदर्शक आहे का? आपल्याला हवा असलेला नेमका पर्याय त्यात नसेल तर? जेव्हा आपण "सगळ्या पर्यायांचा नीट विचार करून मोकळ्या मनानी निवड करता आली पाहिजे" असं म्हणतो तेव्हा कुठेतरी आपल्याला मनापासून हवा असलेला पर्याय उपलब्ध आहे असं आपण गृहित धरलेलं असतं का? तसं नसेल तर मग कसा घेणार मोकळ्या मनानी निर्णय? कारण दिलेल्या पर्यायांची मर्यादा त्यावर आधीच पडलेली असते.<br /><br />खर्या मोकळ्या मनानी तुम्ही निर्णय घेणार असाल तर तुम्हाला स्वत: पर्याय निर्माण करायचं, कमीत कमी धुंडाळायचं स्वातंत्र्य आणि सामर्थ्य हवं. निवडीचं स्वातंत्र्य हे उपलब्ध पर्यायांच्या पलिकडे जायला हवं. किंवा काही बहुपर्यायी प्रश्नांना कसा पाचवा पर्याय असतो न, "वरीलपैकी काहीही नाही", तसा कायम एक पाचवा पर्याय असावा! पण मग "वरीलपैकी काहीही नाही" हा पर्याय बाकीच्या सगळ्या पर्यायांना निरर्थक करतो. शिवाय "वरीलपैकी काहीही" नसलेलं म्हणजे काय हे नक्की माहीत असेल तर तो पाचवा पर्याय निवडण्यात अर्थ आहे न?<br /><br />"हो ना, काही choiceच नाही" असं म्हणत आमचा घोळका ऑफिससमोरच्या रेस्टॉरंट कडे वळला, हे सांगणे नलगे! संध्याकाळी घरी आले आणि मेघना पेठेंचं "आंधळ्याच्या गायी" समोर दिसलं!<br /><br /><strong><span style="font-size:130%;">"</span></strong><br />घटना घडतात.<br />पुरातल्या ओंडक्यासारखी माणसं त्यात वाहून जातात.<br />घडायचं ते घडून जातं...<br />पण तरीही पर्याय असतातच ठाकलेले..<br />तडफडण्याचे... हसण्याचे... रडण्याचे... हरण्याचे... जिंकण्याचे...<br />क्षमेचे... सूडाचे... स्वीकृतीचे... तुकण्याचे... साक्षित्त्वाचे...<br />त्यातला एकच निवडता येणार असतो,<br />आणि निवडावा तर लागणारच असतो!<br />पर्यवसान ठाऊक नसताना अंधारात घ्यावी लागणारी उडी...<br />माणसाच्या आयुष्यात नियत आहे ते हे.<br />यालाच आपण स्वातंत्र्य म्हणतो!<br />जाणिवेचा लख्ख उजेड नाही, आणि नेणिवेचा गच्च अंधार नाही,<br />अशा तिन्हीसांजेला, अंधुक प्रकाशातल्या जुलमी रानात<br />सोडाव्या लागणार्या या आंधळ्याच्या गायी...<br />त्यांना म्हणे देव राखतो...!<br />आणि आंधळा?<br />तो तर फक्त या भोळ्या विश्वासाची बासरी वाजवत राहतो.<br /><span style="font-size:130%;"><strong>"</strong></span><div class="blogger-post-footer">???? ??? ???? ????| ???? ???? ? ??????||</div>Sumedhahttp://www.blogger.com/profile/16250876354718364108noreply@blogger.com14tag:blogger.com,1999:blog-21680120.post-1162750526255122392006-11-05T10:04:00.000-08:002007-03-02T11:58:06.825-08:00चार होत्या पक्षिणी त्यातुम्हाला असं कधी तरी होतं का? होतच असणार. कुठल्या तरी बेसावध क्षणी कुठल्या तरी निमित्तानं कुठलीतरी जुनी गोष्ट आठवते. कुठलातरी जुना प्रसंग आठवतो. कुठलंतरी जुनं गाणं आठवतं. पण माझ्यासारखी "विस्मरणशक्ती" अफाट असेल तर धड पूर्ण आठवत नाही, बारकावे आठवत नाहीत... आणि मग अशी चुटपुट लागून राहते.<br /><br />आता कालचीच गोष्ट बघा न....<br /><br />निमित्त काय झालं ते पुन्हा कधीतरी. पण मला सारखी आठवत राहिली "वीज म्हणाली धरतीला" मधली जुलेखा, "चार होत्या पक्षिणी त्या". आणि हे गाणं पूर्ण काही आठवेना. तेव्हापासून जी काही अस्वस्थ झालीये!<br /><br />तेव्हा या ब्लॉगच्या वाचकांनो (वाचतंय् का हो कोणी?), कोणाकडे असेल हे गाणं पूर्ण, कृपया नोंदा न!<div class="blogger-post-footer">???? ??? ???? ????| ???? ???? ? ??????||</div>Sumedhahttp://www.blogger.com/profile/16250876354718364108noreply@blogger.com7tag:blogger.com,1999:blog-21680120.post-1162177146287748222006-10-29T18:50:00.000-08:002007-03-02T11:59:31.677-08:00Sound of Music<a href="http://www.dmtonline.org/" target="Douglas Morrisson Theatre"><img style="DISPLAY: block; MARGIN: 0px auto 10px; CURSOR: hand; TEXT-ALIGN: center" alt="" src="http://photos1.blogger.com/blogger/4150/1937/320/SoundOfMusic.1.jpg" border="0" /></a><br />My Day in the hills has come to an end, I know<br />A Star has come out, to tell me it's time to go<br />But deep in the dark green shadows<br />Are voices that urge me to stay<br />So I stop and I wait and I listen<br />For one more sound, for one more lovely thing<br />that the hills might say<br /><br />The hills are alive with the sound of music<br />With songs they have sung for a thousand years.<br />The hills fill my heart with the sound of music<br />My heart wants to sing every song it hears....<br /><br />Sound of Music. Magic of Music. ही संगीताची जादू जिवंत अनुभवायची संधी नुकतीच मिळाली. हेवर्डच्या <a href="http://www.dmtonline.org/">डग्लस मॉरिसन थिएटर</a>च्या कृपेने! मारियाची कथा प्रेमकथा आहे, पण सर्वसामान्य प्रेमकथा नाही. संगीताचं प्रेम, निसर्गाचं प्रेम, लहान मुलांचं प्रेम, देशावरचं प्रेम आणि प्रेमावरचं प्रेमसुद्धा! निखळ आणि निरागस, मोकळं आणि बेबंद, अल्लड आणि प्रगल्भ!<br /><br />हा चित्रपट कैक वेळा बघूनही त्या संगीताची जादू इतकी अवीट आहे! सगळीच गाणी लहानपणापासून चढलेली! कोण्या मैत्रिणीनं लावून दिलेलं हे वेड कधी उतरलंच नाही. ती अद्भुत कथा, ते हृदयस्पर्शी आणि अर्थपूर्ण शब्द, ते जादुई संगीत याबद्दल मी नव्याने काय लिहीणार? जिथून या सगळ्या जादूला सुरुवात झाली तो मूळचा Broadway Show कसा असेल हे कुतूहल घेऊन बघायला गेले. आणि चलतचित्राच्या युगात इतकी प्रगती होऊनसुद्धा नाट्यकला का टिकून आहे याची पुन:प्रचिती आली.<br /><br />अगदी छोट्याशा रंगमंदिरात सजलेला संगीताचा सोहळा मंत्रमुग्ध करून गेला. "live music" ची जादूच वेगळी! स्टेजवर आपल्या अगदी समोर पंधरा-वीस नन्स् हातात मेणबत्त्या घेऊन समरसून सुरेल प्रार्थना म्हणतात, त्यानी जी वातावरण निर्मिती झाली, ती कितीही आधुनिक ध्वनी सोयीनी युक्त असलेलं चित्रपटगृह, surround sound, dolby इ. इ. असलं तरी सुद्धा कदापि होणे नाही. अडिच-तीन तासाच्या त्या नाट्यानुभवात भुमिकेशी समरसून जाणार्या कलाकाराची एक-दोन वेळाच जरी नजरभेट झाली तरी तो सगळा अनुभव असा जिवंत होतो की वाटतं, "क्षण एक पुरे नाट्याचा, वर्षाव पडो चित्रांचा" ;-)<br /><br />सुखदु:खाच्या प्रसंगी Sound of Music ची गाणी नेहेमीच साथ देत आली आहेत, देत राहतील. "She climbs a tree" मधला मिश्किल खिलाडूपणा, "High on the hills" मधली पोरकट गंमत, "Climb every mountain" मधलं धीरगंभीर मार्गदर्शन, "These are a few of my favourite things" मधला आनंदी खुशालचेंडूपणा, "I have confidence in confidence alone" मधला आशावाद, "Nothing comes from nothing" मधलं निखळ प्रेम... हे सगळं या नाटकानी परत जिवंत करून दिलं. आणि डोळे मिटून कधीही त्या वातावरणात शिरता येईल असा अनुभवही!<div class="blogger-post-footer">???? ??? ???? ????| ???? ???? ? ??????||</div>Sumedhahttp://www.blogger.com/profile/16250876354718364108noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-21680120.post-1161658050664812272006-10-23T19:41:00.000-07:002017-06-18T11:28:56.407-07:00खरेच का हे!<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
परवा एका मैत्रिणीशी गप्पा मारताना अनिलांच्या या कवितेची आठवण निघाली. तिला नक्की शब्द आठवत नव्हते, आणि मला कुठेतरी लिहून ठेवलेली आठवत होती. म्हणून ही नोंद! त्या निमित्तानं, ही कविता प्रेमकविता आहे की भक्तिकविता किंवा विराणी असावी, अशी चर्चा झालेली आठवली...<br />
<br />
तुझ्या पथावर तुझ्या पदांच्या<br />
पायखुणांच्या शेजारी मम<br />
पायखुणा या उमटत जाती<br />
खरेच का हे?<br />
<br />
मातीमधल्या मुशाफिरीतून<br />
हात तुझा तो ईश्वरतेचा<br />
चुरतो माझ्या मलीन हाती<br />
खरेच का हे?<br />
<br />
खरेच का हे बरेही का हे<br />
दोन जगांचे तोडून कुंपण<br />
गंधक तेज़ाबासम आपण<br />
जळू पहावे?<br />
<br />
आणि भयानक दहन टाळण्या<br />
जवळपणातही दूर राहुनी<br />
स्फोटाच्या या सरहद्दीवर<br />
सदा रहावे?<br />
<br />
-कुसुमाग्रज </div>
<div class="blogger-post-footer">???? ??? ???? ????| ???? ???? ? ??????||</div>Sumedhahttp://www.blogger.com/profile/16250876354718364108noreply@blogger.com2