Friday, August 17, 2007

वास नाही ज्या फुलांना

"ब्लॉगली नाहीस बर्‍याच दिवसात?", माझे ब्लॉग अत्यंत सहनशीलतेने झेलणार्‍या प्रिय मैत्रिणीकडून विचारणा झाली. ब्लॉगायला काही कारण लागत नाही, पण ब्लॉग न लिहायला बरीच आहेत की! "खूप दिवसात काही लिहीले नाही, लिहायला तर बसले आहे, पण काय लिहावे सुचत नाही" अशा अर्थाची एक नोंद टाकावी हा मोह आवरता घेते. "चांदणवेल" समोर पडलं आहे, त्यातलं कुठलंतरी पान उघडते..

वास नाही ज्या फुलांना फक्‍त ती पाहून घे,
धुंद आहे गंघ ज्यांना तो तिथे जाऊन घे.

चांदणे लाटात जेथे साजल्या वाळूमधे,
रात्र संपेतो इमाने गीत तू गाऊन घे.

प्रीत जेव्हा जागणारी सर्वभावे वाहते
बाहुंचा वेढा तिचा तू साहसे साहून घे.

वाढत्या ग्रीष्मात जेव्हा मेघ माथी कोसळे
सारुनी संकोच सारा त्यांत तू न्हाऊन घे

नेम ना लागेल केव्हा तुष्टतेची वाळवी :
वाळण्या ती या जगाचें दु:ख तू लावून घे.

वाटतां सारेंच खोटें, प्रेमनिष्ठा आटतां,
एकटा अंतर्गृहींच्या ज्योतिने दाहून घे.

-बा. भ. बोरकर

4 comments:

Meghana Bhuskute said...

प्रीत जेव्हा जागणारी सर्वभावे वाहते
बाहुंचा वेढा तिचा तू साहसे साहून घे.,

wah.... chandanwel wachayachaa yog ala nawhata. ata wachawech lagnar.

Mints! said...

वाढत्या ग्रीष्मात जेव्हा मेघ माथी कोसळे
सारुनी संकोच सारा त्यांत तू न्हाऊन घे


>> mast ekdam

ithe lihilyabaddal dhanyad ho madam :)

Vaidehi Bhave said...

apratim!

HAREKRISHNAJI said...

"ब्लॉगली नाहीस बर्‍याच दिवसात?"

शायद येवढा सुरेख ब्लॉग लिहीला जाण्यापुर्वीची शांतता होती.